पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्काराचे वितरण

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते ‘युवा गंधर्व’ पुरस्काराचे वितरण

सुंद्रीकला अकादमीच्या वतीने येथील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम्, मोहिनी अट्टम आदी विविध संगीतांच्या कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.

भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत भावपूर्ण वातावरणात कृष्णामाई उत्सव साजरा !

भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत भावपूर्ण वातावरणात कृष्णामाई उत्सव साजरा !

भक्ती, संस्कृती आणि पर्यावरण यांचा सुरेख संगम साधत मिरजेत कृष्णामाई उत्सव साजरा करण्यात आला. मिरजेतील ऐतिहासिक कृष्णा घाट येथे मार्कंडेय मंदिराच्या घाटावर या उत्सवात प्रथम २० फेब्रुवारी या दिवशी घाट, नदी पात्राची वाट यांची स्वच्छता करण्यात आली.

भक्ती, शक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींनुसार युवकांनी जीवनात वाटचाल करावी ! – ह.भ.प. सोपानमहाराज भारमल

भक्ती, शक्ती आणि युक्ती या त्रिसूत्रींनुसार युवकांनी जीवनात वाटचाल करावी ! – ह.भ.प. सोपानमहाराज भारमल

छत्रपती शिवाजी महाराज जीवनातील अडचणींना सामोरे जातांना कधीही डगमगले नाहीत. आई तुळजाभवानीचा नामजप, सतत युद्धाभ्यास आणि वेळप्रसंगी युक्तीने गनिमी कावा यांचा उपयोग करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत आहे !

महाराष्ट्रातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत आहे !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाविषयी नागरिकांना दिलासा द्यायचे सोडून राज्य सरकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार न्यून पडत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या पुढाकाराने मेंढपाळाला आर्थिक साहाय्य !

जनसेवा भाजीपाला संघटनेचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांच्या पुढाकाराने मेंढपाळाला आर्थिक साहाय्य !

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे रंगराव बाबू जोंग (रहाणार राशिवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर) या वयोवृद्ध मेंढपाळाने एका शेतात मेंढ्यांचा कळप उतरवला होता.

जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

जालना येथे दळणवळण बंदी नाही; पण कठोर निर्बंध लागू !

यामध्ये ३१ मार्चपर्यंत इयत्ता १० वी आणि १२ वीच्या शाळा वगळता इतर शाळा, वसतीगृहे, शिकवणीवर्ग, यात्रा, आठवडी बाजार, मोर्चे, आंदोलने हे सर्व बंद रहाणार आहे. शाळा, शिकवणी वर्ग आणि महाविद्यालये जरी बंद असली, तरी शिक्षकांना मात्र शाळेत जाऊन आपले कर्तव्य पार पाडावे लागणार आहे.

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

अकोला येथे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासह पेट्रोल पंपांवर गर्दी

जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद असली, तरीही काही जणांनी ही दुकाने चालू केली आहेत. त्यामुळे अशा दुकानांवर महापालिका प्रशासन, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचारी एकत्र फिरून संबंधितांवर कारवाई करत आहेत.

एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

एकाच वसतीगृहातील ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण !

शहरातील एम्.आय.डी.सी. परिसरातील एका वसतीगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. या मुलीच्या संपर्कात आलेल्या अन्य ४० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बुलढाणा येथे ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था : इंजेक्शन, बाटल्या उघड्यावर !

बुलढाणा येथे ‘कोविड केंद्रा’ची दुरवस्था : इंजेक्शन, बाटल्या उघड्यावर !

‘कोविड केंद्रा’त स्वच्छता नसेल, तर तेथे कोरोनाचा संसर्ग अधिक वेगाने होऊ शकतो, याची जाणीव प्रशासनाला असतांनाही त्याची दुरवस्था कशी होते ? अशी दुरवस्था करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्‍यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायद्यावर शेतकर्‍यांचे सार्वत्रिक मतदान घ्यावे ! – वि.द. बर्वे, सामाजिक कार्यकर्ते

वि.द. बर्वे यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या शेतकर्‍यांची नावे सात-बाराच्या उतार्‍यावर असतील त्यांनाच मताचा अधिकार देऊन सार्वत्रिक मतदान घेऊन ज्यांची बाजू खरी असेल, हे सिद्ध होऊ द्या. ‘दूध का दूध और पानी का पानी’, ठरवण्याचा अधिकार शेतकर्‍यांना लाभू द्या.