
लातूर – जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यात ५ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यामुळे १२ नंबर पाटी, समाजकल्याण विभागाची इमारत, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय हे कोविड सेंटर म्हणून पुन्हा चालू करण्यात आले आहेत. येथील दोन्ही एजन्सीना ऑक्सिजन लिक्विड हे मुंबई येथून पुरवले जात आहे; मात्र रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे मत एजन्सीधारकांनी व्यक्त केले आहे.
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न