
लातूर – जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढत आहे; मात्र १ सहस्र सिलेंडरची मागणी असतांना ७०० सिलेंडरचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यात ५ सहस्रांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यामुळे १२ नंबर पाटी, समाजकल्याण विभागाची इमारत, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालय हे कोविड सेंटर म्हणून पुन्हा चालू करण्यात आले आहेत. येथील दोन्ही एजन्सीना ऑक्सिजन लिक्विड हे मुंबई येथून पुरवले जात आहे; मात्र रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन लिक्विडचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे मत एजन्सीधारकांनी व्यक्त केले आहे.
म्हापसा येथील स्थानबद्धता केंद्रातून रशियाचा नागरिक पसार
आरोंदा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्या रशियाच्या नागरिकाला कारावास
देशातील तुष्टीकरणाचे राजकारण संपून हिंदु अस्मितेचा नवा उदय झाला आहे ! – पालकमंत्री नितेश राणे
उच्च न्यायालयाने हानीभरपाई निश्चित करण्यासाठी मृतांची सविस्तर माहिती मागवली
मुरुड बसस्थानक आगारातील समस्यांविषयी जनआक्रोश बैठकीचे आयोजन !
रुग्णवाहिकेच्या प्रकाशात शवविच्छेदन !