शासनाचा महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्या तहसीलदारांचे निलंबन करावे !
महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तहसीलदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
महसूल बुडवणाऱ्या आस्थापनाला पाठीशी घालणाऱ्यांना तसेच भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तहसीलदारांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वतीने प्रथम सत्राच्या ‘ऑनलाईन’ परीक्षेकरिता ‘लॉग इन’ होत नसल्याच्या अनुमाने ९ सहस्र तक्रारी परिक्षार्थींनी दाखल केल्या आहेत. ‘लॉग इन’ होत नसल्याने पेपर लिहिता येत नाही.
बोरिवली येथील गीतांजली जैन मंदिरात पहाटे ५ वाजता श्री. प्रकाश शहा यांनी जैन धर्माची दीक्षा घेत मुनी बनण्याचा मार्ग स्वीकारला. ते ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’सारख्या एका मोठ्या आस्थापनात उच्च पदावर काम करत होते; मात्र मोठ्या वेतनाची नोकरी सोडून त्यांनी मुनी होण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येळंबघाट येथील लसीकरण केंद्रावर २८ एप्रिल या दिवशी सकाळी ११ वाजता अचानक नागरिकांची गर्दी उसळली. यामुळे सामाजिक अंतरांचे पालन होत नसल्याने पोलिसांना बोलवावे लागले.
१५ एप्रिल या दिवशी जालना येथील जिल्हा रुग्णालयात कचरू मानसिंग पिंपराळे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्याजवळील ३६ सहस्र रुपये, कागदपत्रे, अंगठ्या, भ्रमणभाष चोरीला गेल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले होते. पिंपराळे यांचा मृत्यू झाला तेव्हा अफरोज तिथे कामाला होता.
रेठरे बुद्रुक हे गाव राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानले जाते. १८ सहस्रांहून अधिक लोकसंख्या असलेले हे गाव पोलीस पाटील नसल्यामुळे खोळंबले आहे.
रामनवमीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथे नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले.
तानाजीनगर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. वैशाली कुलकर्णी यांचे जावई योगेश दिलीप कुलकर्णी (वय ४२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन झाले.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू केली आहे, मात्र शहरात संचारबंदीच्या नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाजीनगर येथील जनवाडी येथे अरुण कदम चौकात बंदीच्या वेळेतही दुकाने चालू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
अनेक दिवसांच्या उकाड्यानंतर त्रस्त झालेल्या कोल्हापुराकरांना २९ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजता गारांच्या वर्षावाचा आनंद लुटला. मोठ्या प्रमाणात पडलेल्या आणि मोठ्या आकाराच्या गारांमुळे काही काळ रस्तेही पांढरे शुभ्र झाले होते.