
सोलापूर – आज हिंदु धर्म आणि धर्मीय यांवर विविध प्रकारचे आघात होत आहेत. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर जगताप यांनी केले. धाराशिव येथील सांजा येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

श्री. जगताप यांनी हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व, वक्फ कायदा, हिंदुविरोधी नॅरेटिव्ह (खोटे कथानक) इत्यादी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक हिंदूने स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मशिक्षण घेणे आणि ते आचरणात आणणे, नोकरी, व्यवसाय सांभाळत असतांनाही धर्मरक्षणासाठी संघटितपणे कृती करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
सांजा परिसरात सर्व धर्मप्रेमी हिंदूंनी या सभेची सिद्धता आणि प्रसार केला. या सभेला २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते. सभेनंतर झालेल्या आढावा बैठकीत २५ हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. उपस्थितांनी २ ठिकाणी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली, तसेच ‘गावात अनेक ठिकाणी सामूहिक आरतीच्या माध्यमातून तरुणांचे संघटन करणार’, असे सांगितले.
ह.भ.प. विनायक केशव कुलकर्णी यांना शिर्डी येथे ‘महाराष्ट्र गुणगौरव समाजरत्न’ पुरस्कार प्रदान !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
कीर्तन हे मनाला उपदेश करणारे आहे ! – ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
मुलींमध्ये शौर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आवश्यक ! – प्रा. (सौ.) ज्योती वाघमारे, खासदार, शिवसेना