
भंग पावलेले शिवधनुष्य रामाने भूमीवर टाकले. तेव्हा त्याचे धनुष्याशी पुढील संभाषण झाले.
राम : काय वाटते ?
धनुष्य : आनंदच आनंद ! एखाद्या राक्षसाने उचलले असते, तर जन्मभर धनुष्यबाणांच्या बंधनात पडलो असतो. श्रीरामाने मला मुक्त केले.
राम : पण रामाने भूमीवर टाकले, त्याचे काय ?
धनुष्य : रामाच्या पायाशीच टाकले आणि मला पादसेवा करण्याची संधी दिली.
राम : पण तुझे दोन तुकडे केले, त्याचे काय ?
धनुष्य : माझा अहंकार तोडला. माझे दोन तुकडे झाले; पण त्या तुकड्यांमुळे दोन जिवांचे (राम-सीतेचे) मीलन झाले.
– कै. (सद्गुरु) (डॉ.) वसंत बाळाजी आठवले