बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !
प्रतिवर्षी अस्मानी संकटामुळे पिके नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांचा अपलाभ घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बनावट बियाणे विकले जाते. खरीप हंगामाला आरंभ होण्यापूर्वीच अशा घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकर्यांची प्रचंड हानी होते.