तेहरान (इराण) – इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतियांनी शक्य तितक्या लवकर आपल्या मायदेशी परतावे, असे आवाहन इराणमधील भारतीय दूतावासाने २० जुलै या दिवशी समाजजिक माध्यमांद्वारे केले. यासह ‘कुठल्याही कारणास्तव इराणला भेट देण्याची योजना आखणार्या भारतियांनी इराणमधील सुरक्षेची परिस्थिती सुधारेपर्यंत तेथे जाण्याचा विचार पुढे ढकलावा’, असेही आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचा वणवा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
🚨 MEA Issues Fresh Iran Travel Advisory
The MEA has urged all Indians currently in Iran to leave via designated land border routes in coordination with Indian Embassies.
Despite some flights resuming, Indian citizens are strongly advised not to travel to Iran by air or land… pic.twitter.com/yCucfpdT08
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 20, 2026
भारतीय दूतावासाने पुढे म्हटले आहे, ‘‘वेळोवेळी सद्यःस्थितीची माहिती घेण्यासाठी बातम्यांवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि देशाचा दक्षिण किनारा यांसारख्या सैन्य हालचाली अधिक असलेल्या भागांना भेट देणे टाळावे. इराणमधील ज्या भारतीय नागरिकांनी अद्याप दूतावासाकडे स्वतःची माहिती नोंदवलेली नाही, त्यांनी ती त्वरित नोंदवावी आणि पुढील अद्ययावत माहितीसाठी दूतावासाचे संकेतस्थळ आणि सामाजिक माध्यमे यांवर नियमितपणे लक्ष ठेवावे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.’’ या आवाहनानंतर इराणमधील भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक भारतियांनी मायदेशी परतण्यास आरंभ केल्याचे सांगितले जात आहे.
Advisory as on 19 July 2026. pic.twitter.com/6vYWY5esa2
— India in Iran (@India_in_Iran) July 19, 2026
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध चालू झाल्याच्या आणि अमेरिकेकडून इराणमधील अनेक भागांवर आक्रमण केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही ८ एप्रिल रोजी दूतावासाने इराणमधीत भारतीयांसाठी काही मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या होत्या.

संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
पूर्वी मला बंगालच्या बाहेर हाकलणारे नेते आताही मला भाजप आणि संघ यांची समर्थक ठरवत आहेत ! – Taslima Nasrin