(म्हणे) ‘तालिबानने शरीयतनुसार सरकार चालवावे ! – मेहबूबा मुफ्ती

आज अफगाणिस्तानमध्ये जिहादी आतंकवाद्यांचे राज्य आल्यावर मेहबूबा मुफ्ती अशी मागणी करत आहेत. उद्या काश्मीरमध्येही आणि संपूर्ण भारतामध्ये हीच स्थिती आल्यावर त्याच नव्हे, तर एकजात सर्व धर्मांध नेते हीच मागणी करतील, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

(म्हणे) ‘बलाढ्य अमेरिकेला सामान बांधून परत जावे लागले; भारतालाही अजूनही संधी आहे !’

अमेरिकेला जे जमले नाही, ते करून दाखवण्याची क्षमता भारतीय सैन्यात आहे; मात्र भारतीय सैन्यावर विश्‍वास न ठेवणार्‍या मेहबूबा मुफ्ती अशा प्रकारची विधाने करणारच ! त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना नजरकैदेत नाही, तर कारागृहात टाकले पाहिजे !

(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

मुसलमानबहुल काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना विस्थापित कुणी आणि का केले ? सहस्रो हिंदूंना त्यांच्या बायका आणि मुले सोडून जाण्यास मशिदींमधून कुणी सांगितले ? त्यांच्या हत्या कुणी केल्या ? हे मेहबूबा मुफ्ती का सांगत नाहीत ?

जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !

जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्‍या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत !

मेहबूबा मुफ्ती यांची वर्षभरानंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यावर त्यांनी देशद्रोही विधाने करण्यास चालू केली होती. त्यामुळे त्यांना आजन्म नजरकैदेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येत होते.