अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !
कारवाईची आकडेवारी सांगण्यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांचे त्यांच्याशी संगनमत आहे का ?
कारवाईची आकडेवारी सांगण्यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या अधिकार्यांचे त्यांच्याशी संगनमत आहे का ?
कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाल्यावर त्यांच्याकडे असलेली डायरी पोलीस प्रशासनाच्या वतीने जप्त करण्यात आली होती. या जप्त केलेल्या ‘डायरी’ची प्रत मिळावी, असे आवेदन न्यायालयीन प्रशासनाकडे संशयितांच्या अधिवक्त्यांनी केले आहे.
आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल २४ एप्रिलला लागला आणि यानंतर ‘बाळूमामा देवस्थान’चे विश्वस्त मंडळ विसर्जित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
‘ए.टी.एम्.’ सारख्या दिसणार्या एका यंत्रात काही नाणी टाकल्यावर सामान्य नागरिकांना तात्काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्हाधिकारी कार्यालयांत बसवण्यात आली होती.
उंचगाव येथील ‘जयहिंद मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
परशुराम जयंतीचे औचित्य साधून समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त पालखी अन् भव्य शोभायात्रा यांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात हवन, पूर्णाहुती, कीर्तन, प्रवचन यांसमवेत धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागाच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचा प्रकार २० एप्रिलला सकाळी १० वाजता समोर आला.
‘वक्फ बोर्डा’ला देशातील भूमी बळकावण्याचे अमर्याद अधिकार देणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागणीसाठी १९ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बसस्थानकाशेजारी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
सध्या उन्हाळ्याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्वच्छ पाणी न मिळणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्त नळ, तसेच अन्य त्रुटी दूर कराव्यात, या मागणीचे निवेदन राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांना देण्यात आले.