
कोल्हापूर, २२ एप्रिल (वार्ता.) – श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात हवन, पूर्णाहुती, कीर्तन, प्रवचन यांसमवेत धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. ५ मे या दिवशी दुपारी १२ वाजता महाप्रसाद, पालखी प्रदक्षिणा सायंकाळी ५ वाजता भक्तांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे, अशी माहिती करवीरपीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.
मठाच्या वतीने ८ पुरस्कार !
शंकराचार्य म्हणाले, ‘‘मठाच्या वतीने ८ पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात वेदशास्त्र संपन्न मल्लारी विष्णु धर्माधिकारी यांच्या नावे असलेला ‘वैदिक’ पुरस्कार गोवा येथील सुशांत वासुदेव वझे, ‘श्रीपाद शास्त्री बंडोपंत जेरे-शास्त्री’ पुरस्कार रामटेक येथील मधुसुदन पेन्ना, ‘नरहरबुवा कराडकर-कीर्तनकार’ पुरस्कार ठाणे येथील अशोक गणेश उपाध्ये, ‘श्रीपाद सीताराम गोसावी-स्थानिक वैदिक’ पुरस्कार औदुंबर येथील प्रदीप जोशी, ‘विद्याशंकर भारती स्वामी-सामाजिक गौरव’ पुरस्कार बीड येथील आधुनिक वैद्य दिलीप देशमुख आणि आधुनिक वैद्य राजेंद्र वीर यांना तसेच ‘श्रीमती लक्ष्मीबाई आळतेकर-महिला कीर्तनकार’ पुरस्कार गोवा येथील वंदना प्रदीप जोशी, ‘वेद चुडामणी रंगनाथ आळतेकर-होतकरू विद्यार्थी’ पुरस्कार हा नांदेड येथील विश्वंभर कानशुक्ले आणि परभणी येथील प्रमोद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
पुरस्कार वितरण ४ मे या दिवशी सकाळी १० वाजता होईल. तरी आठवडाभर चालणार्या या कार्यक्रमांमध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी या वेळी केले.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी