भगवंताचे दर्शन घडण्यासाठी साधनारूपी तपस्या करा ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

फोंडा (गोवा) येथील साधिका श्रीमती भारती पालन यांनी ६ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. या सत्कार सोहळ्यात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. अशा स्थितीत हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक आहे.

पू. पद्माकर होनप यांच्या देहत्यागाच्या संदर्भात प.पू.देवबाबा यांनी केलेले मार्गदर्शन !

मी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांना म्हणालो, ‘‘देहत्यागानंतर २ – ३ सेकंदांतच बाबांचा लिंगदेह उच्च लोकात स्थिर झाला आहे’, असे मला जाणवले.’’ त्यावर प.पू. देवबाबा म्हणाले, ‘‘बरोबर आहे. बाबांना पुनर्जन्म नाही. ते वैकुंठलोकात गेले आहेत.

साधना करून ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धभोग भोगून संपवणे आणि साधना करून ईश्वरप्राप्ती करणे, यांसाठी मनुष्यजन्म मिळालेला असतो. ‘साधना’ म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्न ! कलियुगात नामस्मरण ही सर्वोत्तम साधना आहे.

ज्ञानयोगी पू . अनंत आठवले यांच्याकडून ज्ञानामृत प्राप्त करण्याची तळमळ असणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) शिरीष देशमुख (वय ७६ वर्षे)

५.११.२०२२ हा श्री. शिरीष देशमुख यांच्या निधनानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने….

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा

या दौर्‍यामध्ये सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी तेथील संत, आध्यात्मिक संस्थांचे पदाधिकारी, हिंदुत्वनिष्ठ, प्रतिष्ठित आणि उद्योजक यांच्या भेटी घेतल्या, तसेच विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या. याविषयीचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.

हिंदु धर्माच्या शिकवणुकीतून आपण खर्‍या धर्मनिरपेक्षतेसाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

आपल्याला अभिमन्यू बनून बलीदान द्यायचे नाही, तर अर्जुन बनायचे आहे. भक्तांचा कधी बळी जात नाही; म्हणून भक्त बनले पाहिजे. एका भक्तासाठीही देवाला प्रकट व्हावे लागते. आपल्याला लढायचे नाही, तर देवाने आपल्याला माध्यम बनवून कार्य केले पाहिजे.

परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप करायला सांगितल्यावर सनातनचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७२ वर्षे) यांना सुचलेले विचार !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी काळानुसार साधक आणि साधक बनलेले धर्मप्रेमी यांना ‘श्री निर्विचाराय नमः’, ‘ॐ निर्विचार’ किंवा ‘निर्विचार’ यांपैकी एक नामजप करायला सांगितला आहे. याविषयी चिंतन केल्यावर ‘साधकांना यांसारखे अन्य कोणते नामजप सांगू शकतो का ?’, याविषयी माझे झालेले चिंतन गुरुचरणी अर्पण करतो.

आज प.पू. काणे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…

नामस्मरण हा मनुष्याचा मूळ स्वभाव आहे. त्यालाच ‘भजन’ असेही म्हणतात. त्या मूळ स्वभावापासून दूर गेल्यामुळेच आपण हिंदू दुःखी झालो आहोत. त्यामुळे मनुष्य सत्ययुगातून त्रेतायुगात, त्यातून द्वापरयुगात, असे होत होत आता कलियुगात आला आहे.

सनातनचे आदर्श साधक !

‘समाजात प्रसार करतांना असे लक्षात येते की, अनेकांना ‘योग्य साधना म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नसते. त्यातील काही जण साधना म्हणून जे काही करतात, ते सर्व स्वतःच्या मनाने करतात. साधनेमध्ये ‘स्वतःच्या मनाने साधना करणे’, ही साधनेतील पहिली आणि मोठी चूक आहे.