औरंगजेबाच्या अमानुषतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही ! – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेच्या संदर्भात औरंगजेबाकडून करण्यात आलेल्या अमानुष कृत्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी व्यक्त केली. ज्ञानवापी मशिदीमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण करण्याला मुसलमानांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

या वर्षी भारतात १० दिवस आधीच पावसाळ्याला प्रारंभ होणार !

बंगालच्या उपसागरात, तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय पालटांमुळे पावसाळा लवकर येणार आहे, असा अंदाज ‘युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर’ या संस्थेने वर्तवला आहे.

कर्नाल (हरियाणा) येथे ४ खलिस्तानी आतंकवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक !

पुन्हा मोठ्या प्रमाणात चालू झालेली खलिस्तानी आतंकवाद्यांची वळवळ ठेचून काढण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

देहलीतील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्यास केंद्र सरकारला सांगावे !

देहली राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याची मागणी भाजपकडून करण्यात आल्यावर सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून त्याला सहमती दर्शवण्यात आली आहे.

देहलीमध्ये लहान मुलांच्या भांडणामुळे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

धर्मांधांना हिंदूंवर आक्रमण करण्यासाठी कोणतेही कारण चालते, त्याचेच हे एक उदाहरण !

पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३ मध्ये मुख्यमंत्री असतांना केंद्राला ‘कर्णावती’ असे नाव देण्यास सुचवले होते

मुसलमान पुरुषांना बहुविवाह करण्यास मान्यता देऊ नये ! – देहली उच्च न्यायालयात जनहित याचिका

यावर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ ऑगस्टला होणार आहे.

जगभरात वर्ष २०२१ मध्ये २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे जंगल नष्ट !

जगभरात वर्ष २०२१ मध्ये प्रत्येक मिनिटाला १० फुटबॉल मैदानाएवढे वनक्षेत्र नष्ट झाले. त्याचे क्षेत्रफळ २ लाख ५३ सहस्र चौरस किलोमीटर एवढे म्हणजे उत्तरप्रदेश राज्याएवढे आहे.

पाश्चात्त्य देशांनी दरोडेखोरांसारखे येऊन भारताला लुटले ! – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

आपल्यातील अनेकांनी दुसऱ्या देशात ‘अवमानाचे शतक’ हा शब्द ऐकला असेल. वास्तविक भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्त्य देश दरोडेखोरांसारखे भारतात आले आणि त्यांनी अनुमाने १९० वर्षे राज्य केले.

समान नागरी कायदा राज्यघटनाविरोधी ! – ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा थयथयाट !

समान नागरी कायदा केल्यामुळे मुसलमानांना अनेक बायका करणे, अनेक मुले जन्माला घालणे आदी गोष्टी करण्यास मिळणार नसल्यानेच त्यांच्या संघटना याला विरोध करत आहेत !