वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी भाड्याने रथ आणल्यावर ‘तो परत करू नये’, असे वाटणे आणि महर्षींनी वर्ष २०२३ मधील रथोत्सवासाठी रथ बनवण्याची आज्ञा देणे
रथोत्सव झाल्यानंतर आम्ही प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘हा रथ परत पाठवण्यासाठी मन सिद्ध होत नाही. आपण हा रथ ठेवून घेऊया का ?’’ तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘हा रथ परत पाठवायचा आहे ना, तर पाठवूया. पुढे देवाची इच्छा असेल, तर आपला रथ सिद्ध होईल.’’