साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मनक्षत्राच्या देवतेसाठी हवन आरंभ झाल्यावर वातावरण अकस्मात् आल्हाददायक होऊन थंड हवेचा झोत यज्ञस्थळाच्या दिशेने आला. त्या वेळी ‘ही परात्पर गुरुदेवांच्या अवतारत्वाची प्रचीती आहे’, असे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले.
हे भव्य मंदिर पहातांना ‘त्या काळी एका पर्वतावर एवढे मोठे दगड नेऊन मंदिर कसे बांधले असेल ?’, याची कल्पनाही करवत नाही. खरेच, आपले महान पूर्वज, दैवी आणि धर्मशास्त्रसंपन्न शिल्पकार अन् त्यांना राजाश्रय देणारे राजे यांना आमचा कोटीशः प्रणाम !
हिंदु राष्ट्रात रस्त्यावरील फलक हे आध्यात्मिक स्तरावरील असतील. यामध्ये साधनेचे थोडक्यात महत्त्व फलकावर लिहिले जाईल. ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करा !’, असे लिहिले जाईल. तसेच घाटरस्त्याला आरंभ होण्यापूर्वी असलेल्या फलकावर ‘येथे २ मिनिटे थांबून देवाला प्रार्थना आणि नामजप करा !’, असे लिहिले जाईल.
पायांच्या बोटांवरून चारचाकीचे चाक जाऊनही पायाला काहीच न होणे आणि हे पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
‘यज्ञाच्या आधी पू. भार्गवराम (सनातनचे पहिले बालसंत, वय ६ वर्षे) यांची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. त्या वेळी पू. भार्गवराम हे श्रीकृष्ण रूपात दिसल्यानंतर सेवाकेंद्राच्या जवळ मोर ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता.
‘सनातनचे तीनही गुरु स्थुलातून आमच्या पुढे असलेल्या रथात विराजमान आहेत आणि आम्ही त्यांच्या रथामागून चालणार आहोत’, हे लक्षात येताच माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले.
श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला चेन्नई येथे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या निवासस्थानी एका सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली. तेव्हा अत्यंत अल्प वेळेतही मला श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यातील चैतन्य आणि प्रीती अनुभवता आली.