गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतियांचा बंदोबस्त करा ! – करवीर शिवसेना

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वत:हून का नोंद घेत नाही ?

मुंबईतील वाडिया रुग्णालयाला भीषण आग !

रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर शस्त्रक्रिया विभागाच्या ठिकाणी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीनंतर अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले असून सायंकाळी ७.१५ वाजता आग विझवण्याचे प्रयत्न चालू होते

महागाईच्या विरोधात विधीमंडळाच्या बाहेर आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी कह्यात !

सत्तेत असतांना जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे आणि निवडणूक हरल्यानंतर जनताभिमुख असल्याचे भासवणे ही सर्वपक्षियांची नीती जनता ओळखून आहे. सत्ताकाळात महागाई रोखण्यासाठी ठोस भूमिका घेतली असती, तर काँग्रेसच्या आंदोलनाला नैतिकता प्राप्त झाली असती !

दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे !

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’च्या मुख्य संपादकपदाचे दायित्व पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे दायित्वकडे स्वतःकडे घेतले आहे

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून समन्स !

बलात्कार पीडितेला धमकावल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स पाठवला आहे. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्या विरोधात २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भारत विश्वगुरु व्हावा !

गुरुकुल शिक्षणपद्धत अस्तित्वात असतांना विश्वगुरुपदी विराजमान असणारा भारत सर्वांनाच अभिप्रेत आहे. गुरुकुल पद्धतीचे पुनरुज्जीवन झाल्यासच ते शक्य होईल. हे सर्वस्वी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या हातात आहे. आदर्श आणि उज्ज्वल भारत घडवण्यासाठी ‘भारतीय शिक्षण बोर्डा’च्या पुढील वाटचालीस सर्व भारतियांच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

अवैध फलकबाजीला आळा कधी ?

लोकप्रतिनिधींनी आपापल्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी केल्यास त्यांना फलकांद्वारे जाहिरातबाजी करावी लागणार नाही, हे नक्की ! हिंदु राष्ट्रात प्रामाणिक, जनतेचे हित साधणारे आणि निःस्वार्थी लोकप्रतिनिधी असतील. त्यामुळे अवैध फलकबाजी निश्चितच नसेल !

अमरावती येथे दोन ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू

अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे ट्रक लोखंडी गज (बार) घेऊन जात होते.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वस्त धान्यावरील अधिकार सोडावा !

आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍यांनी स्वत:हून पुढे येऊन स्वत:ची शिधापत्रिका पालटून पांढरी शिधापत्रिका घ्यावी. पडताळणीमध्ये तसे न आढळल्यास फौजदारी गुन्हे नोंद करण्यात येतील, अशी चेतावणी पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.