नाशिक येथे कृत्रिमरित्या आंबे पिकवणार्‍यांच्या विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम !

अनैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खाणे आरोग्यास चांगले नसते. कच्चे आंबे वाहतुकीच्या दृष्टीने पाठवणे योग्य असते. आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आर्सेनिक आणि फॉस्फरस हे घटक असलेल्या औषधांचा वापर केला जातो. 

उन्हाळ्याच्या प्रारंभीच सोलापूर येथील १९ गावांत टँकरने पाणीपुरवठा !

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, यासाठी प्रशासनाने प्रबोधन करणे आवश्यक !

डोंबिवली येथे अनधिकृत इमारतींना चोरून नळजोडणी देणारा अटकेत

चोरीच्या नळजोडण्या देत असल्याच्या तक्रारी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे आल्या होत्या. अनधिकृत इमारतीला पाणी देतांना त्याला रंगेहातच पकडण्यात आले. पथकाने जाधव याचे नळजोडणीचे सामान, अवजारे जप्त केली.

कांदा निर्यातबंदी ३१ मार्चनंतर कायम रहाणार !

देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची उपलब्धता आणि किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यातबंदीचा हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील, असे केंद्राने नवीन परिपत्रकात म्हटले आहे.

गोव्यात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – ‘वीर सावरकर युवा मंच, डिचोली’ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वीर सावरकर यांच्याविषयी योग्य माहिती मिळाल्यानंतर त्यांच्याविषयी विनाकारण निर्माण केल्या जाणार्‍या वादांना चाप बसेल. यासाठी सर्व सामान्यांनी हा चित्रपट पाहिला पाहिजे. हा चित्रपट गोव्यात करमुक्त करावा आणि विद्यार्थ्यांना  विनामूल्य दाखवावा. असे निवेदनात म्हटले आहे

आदिवासी शाळांतील मुलांचे दूध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार !

राज्यातील आदिवासी शाळांमध्ये देण्यात येणार्‍या दुधात ८० कोटींचा आणि सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘पोषण आहारा’मध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप ‘शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

सातारा येथे बुलेटचालकांवर कारवाई !

येथील मोती चौकात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणार्‍या बुलेटचालकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. गत काही दिवसांपासून शहरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणारे बुलेटचालक सुसाट वेगाने बुलेट चालवत होते.

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील बसथांब्यांच्या पाट्या काढून टाकल्याने गावातील प्रवाशांची गैरसोय !

सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणामध्ये गावालगत असणार्‍या बस थांब्यांच्या पाट्या, तसेच काही ठिकाणी बसथांबे काढून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

निवडणूक कामकाज करणार्‍यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवा ! – जिल्हाधिकारी

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा यांच्यावर शेतकर्‍यांची २२ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा !

नेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?