बिहार सरकार प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार
कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार सरकार प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.
केंद्र सरकारने १४ एप्रिलपर्यंत देशभरात दळणवळण बंदी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणांवरही १४ एप्रिलपर्यंत बंदी घातली आहे. यापूर्वी ही बंदी ३१ मार्चपर्यंत घालण्यात आली होती. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. केवळ मालवाहू विमानांचे उड्डाण चालू ठेवले जाणार आहे.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता.
लष्कर ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेने पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.च्या साहाय्याने ‘द रजिस्टेंस फ्रंट जम्मू-कश्मीर’ नावाची नवी जिहादी आतंकवादी संघटना बनवली आहे. या संघटनेच्या ६ आतंकवाद्यांना पोलिसांंनी अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणार्या आणि कोरोनाला रोखण्यासाठी सैनिकांप्रमाणे प्रयत्न करणार्या आरोग्य विभागातील कर्मचार्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घोषित केला आहे.
देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ७५३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.
शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.
देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात रोखता येईल……
गोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.