
नवी देहली – देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत ८०३ झाली असून एकूण २० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २६ मार्चला देशभरात ४२ नवे रुग्ण आढळले. आरंभी देशात १ मार्चपर्यंत केरळमध्ये ३ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. २ मार्चपासून वाढत चाललेला कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला नाही.
दळणवळण बंदीमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा वेग स्थिरावला ! – आरोग्य मंत्रालय
नवी देहली – देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली, तरी त्याच्या प्रादुर्भावाचा वेग स्थिरावला आहे. त्यामुळे आता आपण ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांमध्ये योग्य अंतर राखणे) आणि योग्य उपचार, या दोन गोष्टी काटेकोरपणे पाळल्या, तर आगामी काळात देशात कोरोनाचा प्रादुर्भाव तिसर्या टप्प्यापर्यंत पोचू शकणारच नाही, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लाल अग्रवाल यांनी सांगितले. केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार सध्या १७ राज्यांमध्ये केवळ कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयांच्या उभारणीला प्रारंभ झाला आहे.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !