
नवी देहली – देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्याच प्रमाणात रोखता येईल. दळणवळण बंदीच्या, म्हणजेच २१ दिवसांच्या कालावधीमध्ये भारताला स्वतःच्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यास वेळ उपलब्ध होईल. भारतामध्ये कोरोनाचे आणखी रुग्ण सापडतील; पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही; कारण प्रत्येक देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर हळूहळू ही संख्या न्यून झाल्याचेही आढळले आहे, असे मत ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग हा हंगामी आजार होईल. त्यावर औषधे आणि लस उपलब्ध होईल. त्यामुळे कोरोना पूर्णपणे नष्ट झाला नाही, तरी त्यावर नियंत्रण मिळवता येईल. हा रोग ‘स्वाईन फल्यू’पेक्षा अधिक वेगाने पसरत असल्याने आपल्याला अधिक सावध रहावे लागेल.’’
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
आहारात साखर, तेल अल्प करा आणि व्यायामावर भर द्या ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री