गोव्यात १७ एप्रिलपासून जी-२० च्या ८ बैठका होणार

जी-२० शिखर परिषदेच्या वाहतुकीसाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’पासून ते प्रतिनिधींसाठी वैद्यकीय सुविधा, २४ घंटे हॉटलाईनची उपलब्धता, ३० खाटांची दर्जात्मक सुविधा आदी सिद्धतेसह आरोग्य विभागाने दावा केला आहे की, ते कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत.

गोवा : कॅसिनोंची कोरोना महामारीच्या काळातील ३२२ कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

गोवा सरकारने कॅसिनोचालकांना वार्षिक १२ टक्के दराने दंडात्मक व्याजासह बंद कालावधीतील आवर्ती कराची थकबाकी भरण्याचे निर्देश दिले होते. या आदेशाला कॅसिनोचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

गोव्यात इमारतींवरील पायाभूत सुविधा करात वाढ

सरकारकडून निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर प्रकारच्या इमारतींवर घेतल्या जाणार्‍या पायाभूत सुविधा करात वाढ केल्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

पुरंदर (जिल्हा पुणे) येथील कीर्तनकार ह.भ.प. संदीप मांडके यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

संदीप मांडके हे कीर्तनातून सनातनच्या ग्रंथांची माहिती सांगतात. श्री. राज कर्वे यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. ह.भ.प. संदीप मांडके आणि सौ. मांडके यांनी जिज्ञासेने कार्य जाणून घेतले.

पश्चिम महाराष्ट्रात गदापूजन करून हनुमंताला हिंदु राष्ट्रासाठी साकडे !

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे २७० हून अधिक ठिकाणी गदापूजन, सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन.

मुंबई, ठाणे, रायगड येथे हनुमान जयंतीनिमित्त गदापूजन !

हनुमान जयंतीनिमित्त मुंबईत घाटकोपर, चेंबूर, गोरेगाव आणि नवी मुंबईत सानपाडा आणि आंग्रोळी गाव येथे गदा पूजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात वावे येथे, तर ठाण्यामध्ये पिंपळपाडा आणि नालासोपारा येथे गदापूजन करण्यात आले.

भाईंदर येथे क्षुल्लक कारणावरून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या !

१३ वर्षीय मुलाने केस पुष्कळ छोटे कापले गेल्याच्या कारणासाठी इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रात्री कुटुंबातील सर्व जण झोपलेले असतांना त्याने स्नानगृहाच्या खिडकीतून उडी मारली.

सरपंच गोपाळे हत्या प्रकरणी ७ जण कह्यात !

स्थानिक वादातून सरपंच गोपाळे यांची हत्या केल्याचा संशय त्यांचे भाऊ रवींद्र यांनी व्यक्त केला होता; मात्र पोलीस अन्वेषणात नेमके कारण समोर आले नाही.

कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे ! – सौ. राजश्री देशमुख, हिंदु जनजागृती समिती

जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक असते. सध्या कलियुगात ‘नामस्मरण’ ही सर्वश्रेष्ठ साधना आहे.

२० कोटी किमतीचे १ सहस्र ९७० ग्रॅम कोकेन जप्त !

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्‍यांनी ५ एप्रिल या दिवशी मुंबई विमानतळावर अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा अपप्रकार उघड केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आफ्रिकी व्यक्तीसह एकूण तिघांना अटक केली आहे.