भारतात आगामी काळात येणारी उष्णतेची लाट सहन करण्यापलीकडे असेल !  

जागतिक बँकेने प्रकाशित केलेल्या अहवालात भारत आधीपासून उष्णतेचा सामना करत आहे. येणार्‍या उन्हाळ्यापूर्वीच उन्हाळा चालू होणार असून त्याची तीव्रता पूर्वीपेक्षा अधिक असणार आहे’, असा दावा केला आहे. ‘भारत जगातील पहिला देश असेल, ज्यामध्ये उष्णता मनुष्याला सहन करण्याच्या पलीकडे असणार आहे’, असेही यात म्हटले आहे.

तुम्ही देशाला नष्ट कराल !

तुम्ही देशाला नष्ट कराल. जर देशाची सीमा सुरक्षित नसेल, तर देश कसा चालेल ? तुम्हाला वाईट गोष्टींना लगाम घालायला हवा, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारला फटकारले.

‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ५.९० टक्क्यांवरून ६.२५ टक्के इतका झाला आहे. यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज अधिक महाग होणार आहे.

देहली महानगरपालिकेवर आम आदमी पक्षाची सत्ता !

देहली महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण २५० जागा असणार्‍या या महानगरपालिकेत आम आदमी पक्षाला १३४ जागा मिळाल्या आहेत, तर सत्ताधारी पक्ष भाजपला १०४ जागा मिळाल्याने त्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांना अटक  

भारतात लोकशाही असल्यामुळे कुणी कुणावरही आरोप किंवा टीका करू शकतो; मात्र कुणी खोटे आरोप करून कुणाची अपकीर्ती करत असेल, तर त्याला शिक्षा होणे आवश्यक आहे !

बळजोरी किंवा फसवून केलेले धर्मांतर हे गंभीर सूत्र ! – सर्वोच्च न्यायालय

बळजोरीने होत असलेल्या धर्मांतराच्या संदर्भात भाजप नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनीकुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ डिसेंबरपासून चालू होणार आहे.

सनातन धर्माच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे लक्ष्य पूर्ण करा ! – कपिल मिश्रा, संस्थापक, हिंदु इकोसिस्टम

हिंदु जनजागृती समिती आयोजित उत्तर भारत हिंदु राष्ट्र अधिवेशन पार पडले !

आतंकवाद असेपर्यंत पाकशी कोणतीही चर्चा नाही ! – भारताचा पुनरूच्चार !  

आतंकवाद चालू असेपर्यंत पाकिस्तानसमवेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाहीत, असा पुनरुच्चार भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास दिला नकार !

आता केंद्र सरकारनेच त्या ठिकाणी उत्खनन करून सत्य इतिहास लोकांसमोर आणावा, अशीच हिंदु समाजाची अपेक्षा आहे. असे केल्यास अशा याचिका पुनःपुन्हा प्रविष्ट केल्या जाणार नाहीत !

जगातील सर्वांत प्रदूषित देशांमध्ये भारत ५ व्या क्रमांकावर !

विदेशी आस्थापनांनी सिद्ध केलेले अशा प्रकारचे अहवाल किती खरे असतात, याचाही आता शोध घेण्याची आवश्यकता आहे. पाश्‍चात्त्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते, हे जगजाहीर असतांना विकसनशील देशांना प्रदूषणासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे !