मुंबई विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ९ मे या दिवशी ६ घंट्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर धावपट्टीची दुरुस्ती आणि देखभाल यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विमानतळ बंद राहिल्याने प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत ही कामे करण्यात येतील. याविषयीची सूचना ६ महिने अगोदरच विमानचालकांना देण्यात आली आहे.