उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे विधान

बहराइच (उत्तरप्रदेश) – जेव्हा संपूर्ण जग भारताच्या संस्कृती आणि परंपरा यांचे कौतुक करत आहे, तेव्हा कोणत्याही परकीय आक्रमकाचे उदात्तीकरण करू नये. आक्रमकाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोहाचा पाया भक्कम करणे आहे.
आक्रांता का महिमामंडन मतलब देशद्रोह की नींव को पुख्ता करना…
स्वतंत्र भारत में ऐसे किसी देशद्रोही को स्वीकार नहीं किया जा सकता है… pic.twitter.com/BVHGaxY6zt
— Yogi Adityanath (@myogiadityanath) March 20, 2025
स्वतंत्र भारतातील महापुरुषांचा अपमान करणार्या कोणत्याही देशद्रोही व्यक्तीला स्वीकारू शकत नाही, अशा शब्दांत उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरंगजेब, तसेच महंमद गझनीचा पुतण्या सय्यद सालार मसूद गाझी यांचे नाव न घेता त्यांच्या समर्थकांवर टीका केली.
🚨Yogi Adityanath Slams the Glorification of Invaders!
🔥 Glorifying Invaders = Treason! UP CM Yogi Adityanath warns amid the Aurangzeb row!
🛕 New India’s Stand: We reject insults to our ancestors and won’t praise those who attacked our civilization! 🇮🇳
🚫 UP Govt refuses to… pic.twitter.com/9FIWGMu0GO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 21, 2025
उत्तरप्रदेशातील संभल येथे गाझी याच्या नावाने गेली अनेक शतके मेळा आयोजित केला जात होता. त्याला यावर्षीपासून अनुमती नाकारण्यात आली आहे. याच गाझीचा मेळा बहराइच आणि बाराबंकी येथेही अयोजित केला जातो. बाराबंकी येथे त्याची कबर आहे. आता तेथेही अनुमती नाकारली जाईल, असेच मुख्यमंत्र्यांच्या वरील विधानांवरून स्पष्ट होत आहे. याच पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषदेने बहराइच येथे गाझीचा मेळा आयोजित करण्यास अनुमती न देण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे.