भगवान श्रीकृष्णाची शिकवण आचरणात आणल्यास हिंदु समाजाचे रक्षण शक्य !

श्री. गिरिधर मामिडी

ब्रिटिशांनी हिंदूंना नि:शस्त्र केले. हिंदूंकडील शस्त्रे काढून घेतली. ‘शस्त्रे वापरण्याचा हक्क केवळ सरकारचा आहे, लोकांना नाही’, हा विचार हिंदूंवर थोपवला. त्यामुळे कालांतराने हिंदु समाज पूर्णपणे नि:शस्त्र झाला; परंतु मुसलमानांना हे नियम लागू नव्हते. त्यामुळेच वर्ष १९४७ मध्ये काश्मीरमधील राजौरी येथे पाकिस्तानी आक्रमकांनी २० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली. केरळमधील मोपला येथे हिंदूंचे हत्याकांड घडले. अशी हिंदूंची अनेक हत्याकांडे मुसलमानांनी घडवून आणली. आपण काळाच्या ओघात भगवान श्रीकृष्णाची शिकवण विसरलो. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली शिकवण आचरणात आणल्यास आपण हिंदु समाजाचे रक्षण करू शकतो.

– श्री. गिरिधर मामिडी, अखिल भारतीय टोली सदस्य, प्रज्ञा प्रवाह, तेलंगाणा.