
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील अहवाल प्राप्त झाला आहे. घटना घडली तेव्हा साहाय्यक प्राध्यापक आणि प्राध्यापक त्या ठिकाणी उपस्थित असायला हवे होते; ते त्या ठिकाणी नव्हते. अहवालामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना आदेश आजच्या आज (२० डिसेंबर या दिवशी) देण्यात येतील, असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १८ रुग्णांच्या मृत्यूसंबंधातील तारांकित प्रश्न आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला होता.
त्यावर सामंत म्हणाले, ‘‘त्या दिवशी झालेल्या १८ मृत्यूंपैकी ९ रुग्ण अचानक खासगी रुग्णालयांतून अनेक रुग्ण आयत्या वेळी भरती झाले होते. त्यांची अत्यंत गंभीर स्थिती होती. त्यांच्यावर त्वरित उपचार चालूही करण्यात आले होते. त्या वेळी औषधे, ऑक्सिजन, खाटा उपलब्ध होत्या. औषधांअभावी किंवा सेवेअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही. हा प्रसंग घडण्यापूर्वी त्या रुग्णालयांमध्ये ४८ पदांची भरती केली होती. आणि यानंतर १४५ पदांची भरती ही तात्पुरती आणि कायमस्वरूपी अशा स्वरूपात केली आहे.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !