केंद्र सरकारने घुसखोरांविषयी कडक पावले न उचलल्‍यास भारताचे हाल फ्रान्‍ससारखे होतील ! – अनिल धीर, संयोजक, इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘फ्रान्‍सची आग भारतापर्यंत येईल का ?’

मुंबई – एक ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) देश म्‍हणून युरोपमध्‍ये फ्रान्‍सचे उदाहरण दिले जाते. आता फ्रान्‍समध्‍ये ज्‍या दंगली होत आहेत, त्‍या अचानक होत नसून त्‍याची सिद्धता गेल्‍या ३० ते ४० वर्षांपासून चालू आहे. आज फ्रान्‍समध्‍ये लादलेल्‍या धर्मनिरपेक्षतेच्‍या अपयशाचे गंभीर परिणाम तेथील नागरिक भोगत आहेत. युरोपमधील अन्‍य देश आता सतर्क झाले असून फ्रान्‍समध्‍ये जे घडले ते कुठेही घडू शकते. आज भारतात अवैध पद्धतीने रोहिंग्‍या आणि बांगलादेशी मुसलमानांना अनेक ठिकाणी वसवले जात आहे. या घुसखोरांविषयी केंद्र सरकारने कडक पावले न उचलल्‍यास भारताचे फ्रान्‍ससारखे हाल होतील, अशी चेतावणी ओडिशा, भुवनेश्‍वर येथील ‘इंडियन नॅशनल ट्रस्‍ट फॉर आर्ट अँड कल्‍चरल हेरिटेज’चे संयोजक तथा अभ्‍यासक श्री. अनिल धीर यांनी दिली आहे. हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्‍या ‘फ्रान्‍सची आग भारतापर्यंत येईल का ?’, या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

श्री. अनिल धीर

फ्रान्‍समधील स्‍थिती पाहून भारताने पुष्‍कळ सतर्क रहायला हवे ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी

मारिया वर्थ

सध्‍या फ्रान्‍समध्‍ये झालेल्‍या दंगली या पूर्वनियोजित होत्‍या. फ्रान्‍स आणि विविध देशांतील राजकीय नेते शरणार्थीं मुसलमानांचा दंगली अन् हिंसाचार करण्‍यासाठी वापर करत आहेत; मात्र फ्रान्‍समध्‍ये शरणार्थी मुसलमानांनी घडवून आणलेल्‍या दंगलीचे समर्थन करण्‍याची आवश्‍यकता नाही. हिंसा वाढवण्‍यामध्‍ये राजकीय नेते अधिक दोषी असतात. खरे तर नेत्‍यांनी कायदेशीर कारवाईच्‍या वेळी विरोध करता कामा नये. एकंदरीत फ्रान्‍समधील स्‍थिती पहाता भारताने पुष्‍कळ सतर्क रहायला हवे.

फ्रान्‍सप्रमाणे भारतामध्‍येही अवैध पद्धतीने आलेल्‍या रोहिंग्‍या मुसलमानांचा धोका ! – विनोद बंसल, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, विश्‍व हिंदु परिषद

श्री. विनोद बंसल

सध्‍या फ्रान्‍समध्‍ये दंगली घडवून आणल्‍या जात आहेत, तो पूर्वीपासूनच अल्‍पसंख्‍यांकांचा ‘ग्‍लोबल पॅटर्न’ (जागतिक स्‍वरूप) राहिला आहे. प्रथम शरणार्थी म्‍हणून जायचे, नंतर तेथील संस्‍कृती, वारसा, ऐतिहासिक वास्‍तू नष्‍ट करून तेथील लोकांनाच शरणार्थी बनवायचे आणि तिथे ‘दार-उल-इस्‍लाम’चे (इस्‍लामचे शासन चालणारा प्रदेश) राज्‍य आणायचे. काही वर्षांपूर्वी भारतामध्‍येही अवैधपणे आलेले रोहिंग्‍या मुसलमानांचाही असाच धोका आहे. भारतविरोधी शक्‍तींचा बीमोड करण्‍यासाठी समाजाने संघटितपणे शासनाला साहाय्‍य करावे लागेल.