
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा २० डिसेंबर या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार गृहमंत्र्यांनी विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा केली. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या समितीचा अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार ‘येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पथकाचा चौकशी अहवाल सादर करू’, अशी घोषणाही या वेळी गृहमंत्री फडणवीस यांनी केली.
या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही यामागे राजकीय दबाव होता का याविषयी चौकशी करण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप