
नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा २० डिसेंबर या दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी याविषयीची लक्षवेधी सभागृहात उपस्थित केली होती. या लक्षवेधीच्या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या प्रकरणी विशेष पथक नेमून चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार गृहमंत्र्यांनी विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची घोषणा केली. या वेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या समितीचा अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्याची मागणी केली. त्यानुसार ‘येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या पथकाचा चौकशी अहवाल सादर करू’, अशी घोषणाही या वेळी गृहमंत्री फडणवीस यांनी केली.
या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई का करण्यात आली नाही यामागे राजकीय दबाव होता का याविषयी चौकशी करण्यात येईल असे गृहमंत्र्यांनी सांगितले.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, अध्यक्ष, भाजप, मुंबई
MSRTC : स्वच्छतेसाठी जनतेकडून कोट्यवधी रुपये घेऊनही बस आगारांची दुःस्थिती कायम !
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !