धर्मांध मुसलमानांची विधाने आणि त्यावर आक्षेप न घेणारे हिंदू, अपघाताने बनलेले हिंदू अन् हिंदुत्व !

‘नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यापासून भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य राहिले नाही’, अशी ओरड जन्महिंदू नेते, बुद्धीवादी, हिंदुविरोधी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, मुसलमानांचे नेते, मुल्ला-मौलवी या सर्वांकडून सातत्याने करण्यात येते. वास्तविकता अशी आहे की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून हिंदूंचे वर्चस्व असह्य झाल्यामुळे हिंदुविरोधकांच्या जिव्हा नको तेवढ्या सैल सुटल्या आहेत. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांनी, तर सर्व मर्यादा ओलांडल्या असून विषाक्त आणि देशद्रोही विधाने करण्यात त्यांच्यात जणू स्पर्धा लागलेली आहे. त्यांची एकेक विधाने पाहिली की, त्यांच्या मनात हिंदुद्वेष किती ठासून भरला आहे आणि ते या देशातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा किती मोठ्या प्रमाणात अपलाभ घेत आहेत, याची प्रचीती येते.

 

१. धर्मांध मुसलमान नेते आणि मुल्ला-मौलवी यांची काही प्रक्षोभक आणि देशद्रोही विधाने !

श्री. शंकर गो. पांडे

अ. सातत्याने हिंदुविरोधी गरळ ओकण्याची सवय झालेले ‘एम्.आय.एम्.’ (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन) पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी एकदा म्हणाले होते, ‘या देशातील पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवले, तर आम्ही २५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूंना संपवून टाकू !’

आ. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या वेळी एका प्रचारसभेत गरळ ओकतांना असदुद्दिन ओवैसी म्हणाले, ‘‘या राज्यातील पोलिसांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आणि योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर नेहमीसाठी नसणार. कधीतरी मोदी हिमालयात जातील आणि योगी त्यांच्या मठात जातील. मग तुमची गाठ आमच्याशी आहे. त्या वेळेस तुम्हाला कोण वाचवणार ?’’

इ. धर्मांधांचे देहली आणि इतरत्र ‘सीएए’च्या (नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या) विरोधात आंदोलन चालू असतांना ‘एम्.आय.एम्.’चे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण कर्नाटकमधील गुलबर्गा येथे एका सार्वजनिक सभेत म्हणाले होते, ‘‘आम्ही या देशात १५ कोटी आहोत; पण १०० कोटी हिंदूंना वरचढ आहोत. शाहीनबागमधील आंदोलन करणार्‍या आमच्या वाघिणींनीच तुम्हाला घाम फोडला आहे. मग आम्ही १५ कोटी मुसलमान एकत्र रस्त्यावर उतरलो, तर तुमचे काय होईल ? हे समजून घ्या.’’

ई. केरळमधील ‘मुस्लिम एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. फजल कफूर यांनी तर भारतातील न्यायव्यवस्थेलाच नाकारले. ते म्हणाले, ‘‘सीएए’च्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या विरोधात गेला, तर आम्ही दुसर्‍या टप्प्याचा संघर्ष चालू करू. आम्हा आंदोलनकर्त्यांहून या देशातील कोणतेच न्यायालय मोठे नाही. आम्ही आमच्या शस्त्रांनी सज्ज आहोत आणि आमची लक्ष्येही ठरलेली आहेत.’’

उ. ‘सीएए’च्या विरुद्ध आंदोलन चालू असतांना उत्तरप्रदेशातील काँग्रेसचे एक नेते नसिमुद्दीन बरळले होते, ‘‘आम्ही आधी मुसलमान आहोत आणि नंतर हिंदुस्थानी ! इस्लामशी टक्कर घेणार्‍या राज्यघटनेलाही आम्ही मानणार नाही. आम्ही या देशाशी निष्ठावंत नाही. निष्ठावंत तर कुत्रे असतात.’’

ऊ. ‘जेएन्यू’च्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) शरजील नावाच्या एका बेशरम विद्यार्थ्याने एक राष्ट्रविरोधी विधान केले होते, ‘‘आम्हाला ईशान्य भारत आणि आसाम भारतापासून तोडायचे आहे. मी कट्टरतावादी विचारसरणी मानतो आणि भारत इस्लामी देश व्हावा, असे माझे स्पष्ट मत आहे.’’

ए. वर्ष २०१७ मध्ये गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील बाबा रामदेवदास वैद्यकीय महाविद्यालयातील ७० लहान मुलांचा मृत्यू ज्या डॉ. काफिल खानमुळे झाला होता, ते अलीगड मुस्लिम विद्यापिठात विद्यार्थ्यांसमोर म्हणाले होते, ‘‘सीएए हा भारतीय मुसलमानांना दुय्यम नागरिकत्व देणारा आहे. लक्षात ठेवा, आम्ही या देशात २५ कोटी आहोत. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. राज्य कसे करायचे, ते आम्हाला चांगले समजते.’’

ऐ. देहलीमध्ये ‘सीएए’विरोधी आंदोलनात हिंसाचार पसरवण्याच्या आरोपाखाली कारागृहाची शिक्षा भोगून आलेला अलीगड मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी शर्जिल उस्मानी १८.२.२०२१ या दिवशी एल्गार परिषदेत म्हणाला, ‘‘हिंदु हा एक सडलेला समाज आहे. माझा या देशातील पोलीस आणि न्यायव्यवस्था यांवर थोडाही विश्वास नाही.’’

२. ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’ या निधर्मी घोषणेच्या वस्तूस्थितीवर जळजळीत प्रकाश टाकणारे हिंदुद्वेष्टे मौलाना डॉ. झाकीर नाईक यांचे विधान !

कायदेशीर कारवाईच्या भीतीने तुर्कस्तानमध्ये पळून गेलेले मौलाना डॉ. झाकीर नाईक त्यांच्या प्रक्षोभक विधानांविषयी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या जिहादी शिकवणीपासूनच प्रेरणा घेऊन वर्ष २०१७ मध्ये काही धर्मांध युवकांनी बांगलादेशाची राजधानी ढाक्यात बाँबस्फोट घडवला होता. त्यात ४ नागरिक, २ पोलीस अधिकारी ठार आणि ४० जण गंभीर घायाळ झाले होते. या बाँबस्फोटातील आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी मान्य केले होते की, जिहादी बनण्याची प्रेरणा त्यांना झाकीर नाईक यांच्या भाषणातूनच मिळाली होती. या नाईक यांनी एक स्फोटक; पण वस्तूस्थितीवर प्रकाश टाकणारे विधान केले होते. ते म्हणाले होते, ‘‘मुसलमानांनी भारतावर १ सहस्र १०० वर्षे राज्य केले, लाखो हिंदूंच्या कत्तली केल्या, कोट्यवधी हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवले, हिंदूंची २ सहस्र मंदिरे तोडून तेथे मशिदी बांधल्या. भारताचे तुकडे करून बांगलादेश आणि पाकिस्तान अशा २ मुसलमान राष्ट्रांची निर्मिती केली, तरीही येथील आमची भीती वाटणारा हिंदु ‘हिंदु-मुस्लिम भाई भाई’, अशी घोषणा देतो. ही आमच्या इस्लामची ताकद आहे.’’

३. ‘उत्तरप्रदेश, बंगाल, केरळ, आसाम या राज्यांतील आणि भाग्यनगर येथील हिंदूंची स्थिती काश्मिरी पंडितांसारखी करू’, अशी धमकी मौलाना सैय्यद अहमद बुखारी यांनी देणे !

देहलीच्या जामा मशिदीचे सर्वच इमाम त्यांचे वादग्रस्त वर्तन आणि वक्तव्ये यांविषयी नेहमीच चर्चेत राहिले आहेत. इमाम पदावर असतांना मौलाना सैय्यद अहमद बुखारी म्हणाले होते, ‘‘भारतातील उत्तरप्रदेश, बंगाल, केरळ आणि आसाम या राज्यांतील अन् भाग्यनगर येथे मुसलमान आता बहुसंख्य झाले आहेत. इस्लाम धर्मानुसार मुसलमानेतरांनी इस्लामबहुल राज्यात रहाणे ‘हराम’ (अयोग्य) आहे. तेव्हा तेथील हिंदूंनी अन्यत्र निघून जावे. नाहीतर आम्ही काश्मीरमधील पंडितांसमवेत जो व्यवहार केला, तो वरील मुसलमानबहुल राज्यांतील हिंदूंसमवेत करावा लागेल.’’

४. उत्तरप्रदेश निवडणुकीत धर्माच्या आधारावर मते मागणार्‍या समाजवादी पक्षाच्या रफिक अंसारी यांच्यावर विशेष कारवाई न होणे

वास्तविक पहाता धर्माच्या आधारावर मते मागणे, हा गुन्हा आहे. धर्माच्या आधारावर मते मागितल्याचा आरोप ठेवून वर्ष १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आला होता. असे असतांना उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे एक नेते रफिक अंसारी यांनी सरळ सरळ धर्माच्या आधारावर मुसलमानांची मते गेल्या निवडणुकीच्या वेळी मागितली होती. एका प्रचारसभेत मुसलमान समाजाला उद्देशून ते म्हणाले, ‘‘गेली ५ वर्षे आपण उत्तरप्रदेशात योगी यांच्या रूपाने हिंदूंच्या दहशतीत घालवली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये हिंदूंचेच प्राबल्य आहे. त्यांच्याकडून आपल्या समाजातील लोकांना लक्ष्य करून कारागृहात पाठवण्यात आले आहे. आता येणार्‍या निवडणुकीत संधी गमावू नका. नाहीतर तुम्हाला ५ वर्षे हिंदूंच्या गुलामीत रहावे लागेल.’’

५. बंगालमधील इमाम (मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा प्रमुख) नुरूल रहमान बरकती याने हिंदूंना कापून टाकण्याचे वक्तव्य करणे

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हिंदुद्वेष आणि धर्मांध मुसलमानांचा अनुनय यांमुळे तेथे धर्मांध मुसलमानांच्या वागणुकीवर कोणतेही निर्बंध राहिलेले नाहीत. बंगालमधील टिपू सुलतान मशिदीचा इमाम नुरूल रहमान बरकती एकदा म्हणाले, ‘‘हिंदूंनी कितीही विरोध केला, तरी आम्ही भारतीय मुसलमान गोहत्या करूच. मुसलमान कोणत्याच सरकारला भीत नाहीत; कारण आता आमची लोकसंख्या पुष्कळ वाढली आहे. आम्ही हिंदूंप्रमाणे वायफळ चर्चा आणि वादविवाद करत बसत नाही, तर सरळ कापून टाकत असतो.’’

६. प्रक्षोभक भाषणांमुळे धर्मांध मुसलमानांना हिंदुविरोधी कृत्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळणे

कर्नाटकमधील शाळेत मुसलमान मुलींच्या हिजाब घालून येण्याच्या हट्टाला काही हिंदु मुलांनी विरोध केला. तेव्हा काँग्रेसचे नेते मुकर्रम खान म्हणाले, ‘‘हिजाबचा विरोध करणार्‍यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील.’’ त्यानंतर काही दिवसांतच हर्षा या हिंदुत्वनिष्ठ तरुणाची धर्मांध मुसलमानांच्या जमावाकडून निर्घृण हत्या केली.

७. धर्मांध मुसलमानांच्या एकूणच प्रक्षोभक विधानांवरून निघणारे काही निष्कर्ष

भारतातील धर्मांध मुसलमान नेत्यांनी अशी कितीतरी प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत. त्यांची सर्व  प्रक्षोभक विधाने एकत्र केली, तर एक जाडजूड पुस्तक सिद्ध होईल. त्यामुळे काही मोजकीच विधाने या लेखात दिली आहेत. धर्मांध मुसलमानांच्या वरील प्रक्षोभक विधानांवरून खालीलप्रमाणे काही निष्कर्ष निघतात.

अ. मुसलमान समाजाच्या मनात हिंदूंविषयी आत्यंतिक द्वेष भरलेला आहे आणि तो त्यांचे धर्मांध नेते अन् मुल्ला-मौलवींकडून भरवला गेला आहे.

आ. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी यांना लोकसंख्येच्या आधारावर भारताला मुसलमान राष्ट्र बनवायचे आहे किंवा त्यांना या देशाचे विभाजन करायचे आहे.

इ. भारताच्या सर्वोच्चपदी हिंदुत्वनिष्ठ नेता असणे किंवा भारतात हिंदूंचे वर्चस्व असणे, हे त्यांना कदापिही मान्य होणार नाही.

ई. मुसलमानांचा या देशाची राज्यघटना आणि कायदे यांच्यावर थोडाही विश्वास नाही. त्यांना समान नागरी कायद्याहून शरीयतचे कायदे अधिक प्रिय आहेत.

८. देशात अपघाताने जन्मलेल्या हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या प्रक्षोभक विधानावर मूग गिळून स्वस्थ बसणे; पण हिंदूंच्या वास्तविक विधानावर मात्र आकाशपाताळ एक करणे

या देशात मुसलमानांना अभिव्यक्तीचे अमर्याद स्वातंत्र्य दिले गेले आहे आणि आता ते धोकादायक पातळीवर पोचले आहे. या देशात त्यांना अभिव्यक्तीचे एवढे स्वातंत्र्य असूनही  जेव्हा त्यांच्याकडून ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जनतेचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य हिरावले गेले’, अशी ओरड होते आणि त्यांच्या सुरात अपघाताने जन्मलेले हिंदूही सूर मिसळू लागतात, ते पाहून मनाचा क्षोभ होतो. या अनुषंगाने माझ्या मनात एक प्रश्न नेहमी उपस्थित होतो, ‘या देशातील अल्पसंख्य मुसलमान बहुसंख्य हिंदूंच्या विरुद्ध वाटेल तशी प्रक्षोभक वक्तव्ये करू शकतात, तसे पाकिस्तान आणि बांगलादेश येथील एखाद्या हिंदूने मुसलमानांच्या विरोधात एखादे प्रक्षोभक विधान करण्याचे धाडस केले, तर तो जिवंत राहू शकेल का ?’

पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदू सोडा, आज बहुसंख्य हिंदू असणार्‍या भारतातही पुराव्यावर आधारलेले परखड मत व्यक्त करतांना कोणत्याही हिंदूंला सहस्रो वेळा विचार करावा लागतो; कारण या देशात अपघाताने जन्मलेले हिंदु धर्मांधांच्या प्रक्षोभक विधानावर मूग गिळून स्वस्थ बसतात; परंतु हिंदूंच्या वास्तवावर आधारलेल्या विधानावर मात्र आकाशपाताळ एक करतात.

१७ ते १९ डिसेंबर २०२१ या दिवशी हरिद्वार येथे  एका धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या धर्मसंसदेत हिंदूंची सध्याची स्थिती पाहून साधूसंतांनी प्रतिक्रियात्मक म्हणून आक्रमक भाषेचा वापर केला होता. ते म्हणाले होते, ‘‘आपला धर्म आणि आत्मरक्षण यांसाठी वेळ पडल्यास हिंदूंनीही हातात शस्त्रे उचलली पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत धर्मांध या देशाचा पंतप्रधान होणार नाही, याची हिंदूंनी काळजी घेतली पाहिजे.’’ धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) यांची प्रक्षोभक वक्तव्ये पाहिली, तर हिंदु साधूसंतांच्या वरील वक्तव्यांना प्रक्षोभक म्हणता येईल का ? असे कुणालाही वाटेल.

पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचा वंशविच्छेद होत असतांना अन् सलग १० वर्षे भारताचे उपराष्ट्रपतीपद उपभोगणार्‍या हमीद अन्सारी यांच्या देशविघातक वर्तनाचा अनुभव गाठीशी असतांना भारताच्या पंतप्रधानपदावर मुसलमान व्यक्तीला बसवण्याची चूक करावी का?; पण सत्य बोलल्यामुळेही हिंदु साधूसंतांच्या विरुद्ध अपघाताने जन्मलेल्या हिंदूंनी कायदेशीर कारवाईची मागणी केली. धर्मांध नेते आणि मुल्ला-मौलवी जेव्हा जिहादी अन् हिंसक भाषा सर्रासपणे वापरतात, तेव्हा जन्महिंदू बुद्धीवादी कोणत्या बिळात लपलेले असतात, ते काही कळत नाही.’

लेखक : श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ (साभार : दैनिक ‘तरुण भारत’, वर्ष २०२२)