
मुंबई – गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे वृत्त ‘ए.एन्.आय्.’ वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.
मुंबई साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार अबू बकर याला फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय अन्वेषण यंत्रणेने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक केली होती. अबू बकर याच्या अटकेनंतर या चार आतंकवाद्यांना पकडून आणखी मोठे यश अन्वेषण यंत्रणेला मिळाले आहे. साखळी बाँबस्फोटात मुंबईतील १२ ठिकाणी करण्यात आलेल्या बाँबस्फोटात २५७ जण ठार झाले, तर ७१३ जण घायाळ झाले होते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !