आतंकवाद्यांच्या सांगण्यानुसार ‘अजान’ म्हटले आणि भीतीपोटी टिकल्या काढून ‘अल्लाह हू अकबर’ म्हटले !

आतंकवादी आक्रमणात ठार झालेले कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीचा अनुभव !

कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी (डावीकडे)

पुणे – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात ठार झालेले पुणे येथील कौस्तुभ गनबोटे आणि त्यांचे मित्र संतोष जगदाळे यांचे मृतदेह त्यांच्या निवासस्थानी आणले गेले. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. या वेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने सांगितले, ‘‘पहलगाम येथे माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला ‘अजान म्हणा’ असे सांगण्यात आले. तेव्हा आम्ही सर्व महिलांनी मोठ्या आवाजात अजान म्हणायला प्रारंभ केला; पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या पुरुषांना मारले. आमच्या देखतच त्यांना गोळ्या घातल्या. आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे ‘अल्लाह हू अकबर’ (‘अल्ला महान आहे’) म्हणू लागलो. तरीही त्यांनी सर्वांना मारले.’’

संपादकीय भूमिका :

अशी वेळ कुणावरही येऊ नये आणि आतंकवादमुक्त सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अनिवार्य आहे !