पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

‘स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानच्या अनेक भारतविरोधी कृत्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे मिळूनही, त्याविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई न करणारे निष्क्रीय शासनकर्ते देशातील नागरिकांना बाह्य आक्रमणांपासून संरक्षण देऊ शकतील का ? त्याचप्रमाणे नक्षलवाद्यांच्या अमानुष आक्रमणांपासून भारताला मुक्त करू न शकलेले शासनकर्ते देशात अंतर्गत शांतता आणि स्थैर्य कधी प्रस्थापित करू शकतील का ? म्हणजेच भारतीय प्रशासकीय व्यवस्था या देशातील जनतेला बाह्य आणि अंतर्गत दोन्ही पातळ्यांवर सुरक्षित ठेवण्यास असमर्थ ठरली आहे. ही परिस्थिती पालटण्यासाठी केवळ हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रात भारताच्या सर्व शत्रू राष्ट्रांच्या कुकृत्यांवर आणि देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण करणार्यांना चोख उत्तर देणारे, राष्ट्राभिमानाने ओतप्रोत असलेले शासनकर्ते असतील, तसेच प्रजा सुखी आणि बाह्य अन् अंतर्गत आक्रमणांपासून सुरक्षित असेल !’
– पू. तनुजा ठाकूर (११.११.२०२१)
पू. तनुजा ठाकूर
पुरुषार्थांचे महत्त्व
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !