|

गोहत्ती (आसाम) – आसाम राज्याच्या लोकसंख्येची धर्मनिहाय स्थिती पालटून वर्ष २०५० पर्यंत राज्यात सत्ता मिळवण्याचा प्रयत्न धर्मांधांकडून करण्यात येत आहे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले. काही दिवसांपूर्वी दरांग जिल्ह्यातील सिपाझार येथे धर्मांधांनी पोलीस आणि अतिक्रमणविरोधी पथक यांच्यावर केलेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
Illegal settlers aim to capture Dispur by 2050: Himanta Biswa Sarma https://t.co/3EtKUA7Oou
— TOI Guwahati (@TOIGuwahati) October 1, 2021
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, आक्रमण करणार्यांपैकी बहुतेक जण राज्याबाहेरून आले होते. त्यांचे हळूहळू भूमीवर अतिक्रमण करण्याचे षड्यंत्र होते. आता होजाई जिल्ह्यातील लुमडिंग आणि सोनितपूर येथील भूमींवर अतिक्रमण करणे, हे त्यांचे लक्ष्य आहे. त्यांनी नागावच्या बतदरोबा येथे आधीच नियंत्रण मिळवले आहे. अशा प्रकारचे ते लोकसंख्येची स्थिती पालटण्याचा प्रयत्न करत आहेत.
पालक आणि ज्येष्ठ यांनी आजच्या तरुण पिढीशी संवाद साधावा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत
महाविद्यालयांमध्ये गुरु-शिष्य परंपरेची महती सांगणार्या व्याख्यानांना उत्स्फूर्त प्रतिसाद
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले