पुणे – कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राष्ट्रीय शीतसाखळी संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी पुण्यात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अधिवेशन सभागृहात बसलेले काही जण ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचे म्हणत असले तरी त्यांनी राज्याचे नाव घेतलेले नाही. देशातील अन्य राज्यांत मृत्यू झाले असतील तर त्याविषयी मी भाष्य करणार नाही, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. कोल्हापूर, रायगड आणि चिपळूण येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल युनिट तयार करून नागरिकांना सेवा देणार आहे, तसेच लसीकरण करण्यावरही भर देणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
नूतन लेख
- सिंधुदुर्ग : पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील दोडामार्ग तालुक्यात खनिजाचे उत्खनन चालू
- Land Encroachment : पर्यटन खात्याच्या हणजूण येथील भूमीतील उर्वरित अतिक्रमण १५ दिवसांत हटवा ! – मुंबई उच्च न्यायालय, गोवा
- पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !
- अकरावीच्या कोट्यांतर्गत प्रवेशातील अर्ध्यांहून अधिक जागा रिकाम्या !
- प्रक्षोभक वक्तव्यावरून आमदार नीतेश राणे आणि गीता जैन यांवर गुन्हा नोंद !
- रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !