
पिंपरी-चिंचवड (पुणे), २८ जून – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देहू, आळंदी येथील संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहूगाव आणि आळंदी शहर अन् आसपासच्या परिसरात २८ जून ते ४ जुलै २०२१ पर्यंत संचारबंदी असणार आहे. या कालावधीमध्ये येथील सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद रहाणार असून या परिसरातील स्थानिक नागरिकाचे ओळखपत्र दाखवून प्रवेश खुला रहाणार आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्याने या वर्षी बसमधून पालखी पंढरपूला रवाना होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वारकर्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला आहे.

पंढरपूरच्या आषाढी वारीच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातील शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींने साजरा करण्याची मागणी केली आहे.
पनवेल येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर
अकोला येथे ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ यावर व्याख्यान !
आषाढी वारीनिमित्त ‘बंगाली एज्युकेशन सोसायटी स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी काढली हरिनाम दिंडी !
ईश्वरी नियोजनाचे अनुपमेय दर्शन देणारी पंढरीची वारी
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द