असे आंदोलन का करावे लागते ? पोलीस स्वत:हून त्वरित कारवाई का करत नाहीत ?

सोनई (नगर) – वडाळाबहिरोबा येथील रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणाचा तपास लवकर व्हावा, तसेच संबंधित कोविड सेंटर आणि औषध दुकान यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नेवासे तालुका काँग्रेसच्या वतीने शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर ४ घंटे धरणे आंदोलन करण्यात आले. पसार आरोपीवर लवकरच गुन्हा नोंद करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
नगरच्या गुन्हे अन्वेषण पथकाने वडाळाबहिरोबा येथे धाड टाकून रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणात ४ आरोपींना अटक केली होती. या गंभीर प्रकरणाचा तपास शनिशिंगणापूर पोलिसांकडे असतांना १८ दिवस उलटूनही पसार असलेल्या मुख्य आरोपीस अटक झालेली नाही. (ही पोलिसांची अकार्यक्षमता आहे कि तपास करण्याविषयी असलेली अनास्था ? – संपादक)
तालुका काँग्रेस अध्यक्ष संभाजी माळवदे म्हणाले की, या गंभीर प्रकारानंतर दोषी व्यक्तींना पाठीशी घालणे चुकीचे आहे. पोलिसांनी तपासात हलगर्जीपणा केल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद