मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे !  – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

छत्रपती शिवाजी चौक येथे लाक्षणिक आंदोलन करतांना विविध पक्षातील लोकप्रतिनिधी आणि मराठा समाजातील कार्यकर्ते (छायाचित्र सौजन्य – राज मकानदार)

कोल्हापूर, २८ मे – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने दोन दिवसांचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २८ मे या दिवशी मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक येथे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ही मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

या आंदोलनात शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक, काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, भाजप नेते धनंजय महाडिक, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह मराठा समाजातील कार्यकर्ते आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.