चीनवर कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !
नवी देहली – जोपर्यंत तणाव असलेल्या ठिकाणांवरून चीनचे सैन्य माघारी जात नाही, तोपर्यंत पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळील भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही, असे भारतीय सैन्याने चीनला सुनावले असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पँगाँग तलावाजवळील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून दोन्ही देशांचे सैन्य माघारी जाण्याचा निर्णय घेतल्यावर पहिल्या टप्पा पूर्ण झाला असला, तरी आता ही प्रक्रिया धीम्या गतीने चालू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अन्य तणावाच्या ठिकाणांविषयी दोन्ही देशांच्या सैन्यात चर्चा होणार होती; मात्र ती थांबवण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्ताव यांनी म्हटले की, दोन्ही देशांतील संबंध तेव्हाच पुढे जातील जेव्हा सीमेवर शांती राहील. यासाठी पूर्व लडाखमधून दोन्ही देशांचे सैन्य मागे गेले की, शांतता निर्माण होईल. त्यासाठी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Pakistani HoneyTrap Failed : काश्मिरी तरुणाला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून त्याच्याकडून गोपनीय माहिती मिळवण्याचा पाकिस्तानचा डाव फसला !
Trump Netanyahu Dispute : ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात लेबनॉनमधील हिजबुल्लावरील इस्रायली आक्रमणांवरून वाद !
संपादकीय : चीनची आण्विक सिद्धता !