राजभवनावर जावे कि न जावे यासाठी २ गट पडले !
मुंबई – सहस्रोंच्या शेतकर्यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गोव्याला गेल्याने ते पळपुटे असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी नेते अजित नवले यांनी आडमुठी भूमिका घेऊन मोर्चा स्थळावरून हालण्यास नकार दिला. ‘राज्यपाल निघून गेले हा लोकशाहीसाठी वाईट पायंडा आहे’, असे सचिन सावंत या वेळी म्हणाले. शेतकरी नेते अजित नवले हे सतत ‘पोलीस शेतकर्यांची पोरे आहेत, त्यांच्याशी आमचे वैर नाही, आमच्यावर त्यांना सोडले आहे’, असे माध्यमांना सांगत होते.
या मोर्च्यामुळे पोलिसांपुढे कायदा आणि सुव्यवस्थेतेचे मोठे दायित्व निर्माण झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी नेते यांच्या शिष्टमंडळातील मेधा पाटकर, नसीम खान, फिरोज मिठीबोरवाला, सचिन सावंत आदी २३ नेत्यांना राजभवनकडे नेण्यासाठी पोलीस व्हॅनमध्ये बसवले होते; परंतु राजभवनावर निवेदन द्यायला जावे कि न जावे या संदर्भात या नेत्यांमध्ये दोन गट पडले. या शिष्टमंडळात शिवसेनेचा एकही नेता नव्हता.
सौजन्य : टी.व्ही.9 मराठी
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
अनैतिकतेचा बाजार !
Pakistani Brutality Rawalakot PoK : रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) : पाक सैन्याने पुन्हा केले १६ नागरिकांना ठार !