
मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने नवजात बालकांची विक्री आणि खरेदी करणार्या टोळीला अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये एक आधुनिक वैद्य, एक परिचारिका आणि एक लॅब टेक्निशियन यांचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी ७ महिला आणि २ पुरुष यांसह ९ जणांना अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट १ चे अधिकारी योगेश चव्हाण यांनी सांगितले की, ही टोळी मुलांच्या जन्मादात्यांकडून ६० सहस्र ते दीड लाख रुपयांपर्यंत बाळांना विकत घेत असे आणि नंतर ज्या जोडप्यांना बाळांची आवश्यकता आहे, अशांना अडीच लाख ते साडेतीन लाख रुपयांना विकत होती.

वांद्रे येथील खेरवाडी भागात काही लोकांनी मुलांची विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून तीन जणांना कह्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान या संपूर्ण टोळी विषयी माहिती मिळाली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
शासनाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याविषयी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अ.भा.वि.प. शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी ! – अथर्व कुलकर्णी, अ.भा.वि.प.
अजित पवार यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये साजरी होणार !
पुणे जिल्ह्यातील ज्ञात-अज्ञात पर्यटन स्थळांची माहिती पाठवण्याचे पर्यटन संचालनालयाचे आवाहन !