‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्क्यांनी वाढ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘रेपो रेट’मध्ये ०.३५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेपो दर ५.९० टक्क्यांवरून ६.२५ टक्के इतका झाला आहे. यामुळे आता गृहकर्ज, वाहन कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज अधिक महाग होणार आहे.

रूपी बँकेचा परवाना रहित करण्याच्या आदेशाच्या स्थगितीची मागणी अर्थ मंत्रालयाने फेटाळली !

नियमांचे उल्लंघन करणे आणि आर्थिक अनियमिततेमुळे तोट्यात आलेल्या रूपी सहकारी बँकेला वाचवण्याचे न्यायालयीन आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयातील सर्व प्रयत्न अयशस्वी ठरल्याने ही बँक इतिहासजमा होणार आहे.

भारतात ‘डिजिटल करन्सी’चा आरंभ !

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर या दिवशी देशाच्या पहिल्या ‘डिजिटल करन्सी’चा, म्हणजेच पहिल्या आभासी चलनाचा आरंभ केला. या प्रकरणी पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) म्हणून रिझर्व बँकेने ‘सीबीडीसी’, म्हणजेच ‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी होलसेल’ जारी केली आहे.

रिझर्व्ह बँकेने रेपो दर ०.५० टक्क्यांनी वाढवला

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास पत्रकार परिषदेत व्याजदरांविषयी माहिती दिली. ऑगस्टमध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर ४.९० टक्क्यांवरून ५.४० टक्के करण्यात आले होता.

रूपी बँकेसंदर्भातील धोरण रिझर्व्ह बँकेने पालटणे आवश्यक ! – अजित पवार

रिझर्व्ह बँकेने रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित करण्याचा आदेश काढला; पण पुण्यातील ५ ते ६ बँका अडचणीत आहेत. या बँका विलीन करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून रूपी सहकारी बँकेचा परवाना रहित !

बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे.

बँकेने अयोग्य वर्तन केल्यास ग्राहकांना रिझर्व्ह बँकेला संपर्क साधण्याचा अधिकार !

तुम्ही ज्या बँकेचे ग्राहक असाल, त्या बँकेच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारीसाठी तुम्ही बँकेचा तक्रार निवारण क्रमांक घेऊन तक्रार करू शकता. बँकेच्या ‘टोल फ्री’ क्रमांकावरही समस्या सांगू शकता. काही बँकांकडून ऑनलाईन तक्रार प्रविष्ट करण्याची सुविधाही दिलेली असते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध !

आरबीआयने सांगितले, ‘‘ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ सहस्रांपेक्षा अल्प रक्कम काढण्याची अनुमती दिली जाऊ शकते.’’

भारतीय चलनावर प्रथमच दिसू शकतात टागोर आणि कलाम यांची छायाचित्रे !

चलनावर सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांचीही छायाचित्रे छापण्याची सामाजिक माध्यमांद्वारे मागणी !

वर्षभरात विविध बॅँकांमध्ये ६० सहस्र ५३० कोटींहून अधिक रुपयांचे घोटाळे !

अशा घोटाळ्यांमध्ये सर्वसामान्य ठेवीदारांचा पैसा भरडला जातो. यासह बँकांनी दिलेल्या अनेक कर्जांच्या रकमेची वसुली होत नसल्याने अशी कर्जे बडीत खात्यात वर्ग केली जातात.