वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मांस विक्रीची अवैध दुकाने चालू, प्रशासनाकडून दुर्लक्ष
अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्या प्रशासकीय अधिकार्यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !
अवैध मांस विक्रेत्यांवर कारवाई न करणार्या प्रशासकीय अधिकार्यांचे कसायांशी आर्थिक संबंध आहेत का ? याविषयी शासनाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !
धुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघात भाजपचे अमरीशभाई पटेल विजयी झाले आहेत. पटेल हे माजी शालेय शिक्षणमंत्री आहेत. निवडणुकीत ४३७ पैकी ४३४ जणांनी मतदान केले होते.
मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी ३ डिसेंबर या दिवशी शनिवारवाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता
पोलिसांनी गायी पळवणारी ही टोळी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी गाडी सोडून पळ काढला; मात्र गायींना गाडीत कोंबून पळवणार्या टोळीच्या मागे लागलेल्या पोलिसांचे पाठलाग करतांनाचे दृश्य येथील पेट्रोल पंपावरच्या सीसीटीव्ही छायाचित्रकामध्ये कैद झाले आहे.
येथील १७ वर्षीय हिंदु युवतीची छेड काढल्याप्रकरणी जय उपाख्य अलीयास याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध गुटखाविक्रीद्वारे प्राप्त केलेल्या मोठ्या रक्कमेची हवाला व्यवहाराच्या माध्यमातून देवाणघेवाण करण्याचा प्रकार गुन्हे शाखेने २ डिसेंबरच्या मध्यरात्री उघडकीस आणला.
येथील बडमंजी ‘प्लॉट’मध्ये असणार्या श्री अंबाबाई मंदिरातील दानपेटी फोडून १० सहस्रांहून अधिक रुपयांची चोरी केल्याची घटना २९ नोव्हेंबर या दिवशी उघडकीस आली. याशिवाय बसस्थानक परिसरातील मद्यालयातही चोरीची घटना घडली आहे.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ब्रिटीशकालीन जिल्हा कारागृह वर्ग १ येथे १ डिसेंबर या दिवशी सकाळी कारागृह अधीक्षक (श्रेणी २) प्रत्येक बॅरेकमध्ये जाऊन बंदीवानांची पडताळणी करत होते. तेव्हा त्यांच्यावर राहुल उपाख्य सिन्नू शिंदे या बंदीवानाने दाढी करण्याच्या कारणावरून प्राणघातक आक्रमण केले.
येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते.
गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !