‘चांदा ते बांदा’ योजना बंद करून महाराष्ट्र सरकारने सिंधुदुर्गची हानी केली ! – रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते
राज्य सरकारने विकासासाठी निधी दिला तर नाहीच, उलट यापूर्वी आलेला निधीसुद्धा परत घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आणलेल्या ‘चांदा ते बांदा’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला विद्यमान सरकारने तिलांजली दिली.