परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘देव जमिन, पाणी, हवा इत्यादी सर्व फुकट देतो, तरी मानवामुळे मानवाला प्रत्येक गोष्ट विकत घ्यावी लागते !’
‘कुणालाही साहाय्य करतांना ‘त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत’, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मायेतील शिक्षण तन-मन-धनाचा वापर करून पैसे मिळवायला शिकवते, तर साधना तन-मन-धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती करायला शिकवते !’
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर सनातन प्रभातमध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा हिंदु धर्म !’
‘इतर पंथियांचे ध्येय असते ‘दुसऱ्या धर्मियांवर अधिकार गाजवणे’, तर हिंदूंचे ध्येय असते ईश्वरप्राप्ती !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मंदिरातील देवतेचे कर्मचारी दर्शनार्थींना दर्शन देण्याव्यतिरिक्त आणखीन काय करतात ? त्यांनी दर्शनार्थींना धर्मशिक्षण दिले असते, साधना शिकवली असती, तर हिंदूंची आणि भारताची अशी केविलवाणी स्थिती झाली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले