अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसमवेत गेले. अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षाकडून ‘डंके की चोट पे’ (अगदी ठासून सांगणे) निवडणूक लढवणार, असे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

पुणे येथे ‘शहरी गरीब’ योजनेतील बनावट लाभार्थी सापडला

साहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक म्हणाल्या, ‘‘शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजना ‘ऑनलाईन’ केल्यामुळे अनेक बनावट प्रकरणे निदर्शनास आली आहेत.

पुणे जिल्ह्यातील मस्तानी तलावाच्या दुरुस्तीसाठी २ कोटी रुपयांचा निधी संमत !

मस्तानी तलाव १४ एकर क्षेत्रामध्ये असून त्यामध्ये ४० फुटांहून अधिक पाणीसाठा रहातो. गेल्या २ वर्षांपासून पावसाचे प्रमाण अल्प झाल्याने हा तलाव कोरडा पडत आहे.

किरकोळ अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याकडे पुणे पोलिसांचे लक्ष !

पुणे पोलिसांच्या ‘गुन्हे शाखे’ने अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना आणि त्याची घाऊक विक्री करणार्‍यांची साखळी उद्ध्वस्त केली आहे. आता किरकोळ स्वरूपातील अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांची साखळी किंवा विक्रेते यांचा शोध चालू आहे.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत कुदळवाडी (पिंपरी) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ कार्यान्वित !

इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (ई.टी.पी.) कार्यान्वित करण्यात आला आहे.

पुणे येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !

काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. देहली-हरियाणा सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात प्राध्यापक भरतीसाठी ५ सहस्र अर्ज !

पुणे विद्यापिठाच्या विविध विभागांतील प्राध्यापकांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.विविध विभागांतील प्राध्यापक पदाच्या १११ जागांसाठी ५ सहस्र ५०१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये रसायनशास्त्र विषयासाठी सर्वाधिक म्हणजे १ सहस्र ३८ अर्ज आले आहेत.

हैदर शेखने अमली पदार्थ विक्रीतील पैसे ‘हवाला’द्वारे देहलीला पाठवले ! – पुणे पोलीस

‘मॅफेड्रोन’ या अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा ३४० किलो कच्चा माल गुन्हे शाखेच्या पथकाने २ मार्च या दिवशी विश्रांतवाडी येथून जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या कच्च्या मालामध्ये रासायनिक पदार्थांचा समावेश आहे. हा माल एका टेंपोमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.

‘यूएपीए’च्या प्रक्रियेतील अनेक गोष्टींचे पालन केलेले नसल्याने तो कायदा संशयितांना लावणे पूर्णत: चुकीचे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

संशयितांवर ‘यूएपीए’ कायदा लावण्यात आला आहे; मात्र तो लावतांना ज्या अनेक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, ते करण्यात आलेले नाही. हे कलम लावतांना संपूर्ण दोषारोपपत्रात कुठेही हा गुन्हा शासनाच्या विरोधात होता, तसेच यातून देशविरोधी कारवाया होतील, असे काहीच सिद्ध होत नाही.

निगडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला अटक !

अमली पदार्थ प्रकरणात पोलिसांचा सहभाग असणे म्हणजे पोलिसांनीच कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्यासारखे आहे ! अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारागृहात डांबायला हवे !