कॉ. गोविंद पानसरे यांच्‍याकडील जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत संशयितांना मिळाली पाहिजे ! – अधिवक्‍ता अमोघवर्ष खेमलापुरे

कॉ. गोविंद पानसरे यांची हत्‍या झाल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली डायरी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने जप्‍त करण्‍यात आली होती. या जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत मिळावी, असे आवेदन न्‍यायालयीन प्रशासनाकडे संशयितांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी केले आहे.

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील दोन पंचांच्या साक्षी !    

या प्रकरणी ३ एप्रिलला सरकार पक्षाच्या वतीने मुंबई येथील पंच विजयकुमार नार्वेकर, तर कोल्हापूर येथील पंच सुनील जाधव यांची साक्ष नोंदवण्यात आली.

कॉ. पानसरे हत्‍या प्रकरणात १० संशयितांवर दोष निश्‍चित : संशयितांकडून दोष अमान्‍य !

या खटल्‍यात एकूण १२ संशयित असून त्‍यांतील २ संशयित पसार आहेत, असे सरकार पक्षाचे म्‍हणणे आहे. वरील १० संशयितांपैकी समीर गायकवाड हे सध्‍या जामिनावर आहेत.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापुरात चालवण्यासाठी शासनाकडे आवेदन सादर केल्याची आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयात माहिती !

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालवावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात दिली. पथकाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यायालयात ही माहिती दिली.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात वर्ष २०१५ मध्ये जेव्हा पहिल्यांदा समीर गायकवाड यांचे जामीन आवेदन फेटाळण्यात आले. तेव्हापासून आम्ही दोष निश्चितीची मागणी करत होतो; मात्र सरकार पक्षाच्या वतीने वारंवार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात आहे.

उच्च न्यायालयाने तपास ‘ए.टी.एस्.’कडे वर्ग केल्याच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी २३ ऑगस्टला !

उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी आता २३ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे काम पहात आहेत.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण विशेष पोलीस पथकाकडून (‘एस्.आय.टी.’कडून) आतंकवादविरोधी पथकाकडे (‘ए.टी.एस्.’कडे) वर्ग करण्याचा आदेश ३ ऑगस्ट या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने दिला. आतापर्यंत हे अन्वेषण विशेष पोलीस पथक करत होते.

सर्व संशयितांना एकदा प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित करण्यात यावे !  – अधिवक्ता समीर पटवर्धन

कॉ. पानसरे हत्या प्रकरणात सर्व आरोपी हे वेगवेगळ्या कारागृहात आहेत. कर्नाटक येथील कारागृहात असलेल्या आरोपींना भेटण्यासाठी ८०० किलोमीटर अंतर जावे लागते आणि इतके होऊनही भेटीसाठी केवळ १० मिनिटे मिळतात. तेथील संशयितांना माझ्याशी सविस्तर बोलायचे आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे ‘एस्.आय.टी.’कडे असलेले अन्वेषण ‘एटीएस्’कडे वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, यासाठी प्रविष्ट केलेले आवेदन न्यायालयाने फेटाळले !

कॉ. गोविंद पानसरे प्रकरणात  नेमके हल्लेखोर कोण ? हेच निश्चित नसल्याने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि सचिन अंदुरे यांची निर्दाेष मुक्तता करावी, असा युक्तिवाद अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केला होता.