अफगाणिस्तानला तालिबानीस्तान होऊ देणार नाही !

अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांची चेतावणी

(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

चीनने अरुणाचल प्रदेशजवळील सीमेपर्यंत बांधला महामार्ग !

चीन वारंवार कुरापती काढत असून त्याच्या विरोधात आक्रमक धोरण राबवून त्याला धडा शिकवणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताचा पॅलेस्टाईनला पाठिंबा

भारताचे या परिषदेतील प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती यांनी बैठकीत म्हटले की, आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याची आणि तणाव वाढवणार्‍या कारवाया रोखण्याचे आवाहन करत आहे.

पँगाँग सरोवराच्या ठिकाणी भारताने कोणताही प्रदेश गमावलेला नाही !- सैन्यदलप्रमुख नरवणे यांची स्पष्टोक्ती

भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन सीमेवर सुरक्षा धोका अन् युद्धाची शक्यता याविषयी सैन्यदलप्रमुख नरवणे म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर आपल्याला आव्हाने आहेत आणि त्यासाठी आम्ही सदैव सिद्ध आहोत.

चिनी सैनिक पँगाँगमधून हटले, तरी प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील धोका टळलेला नाही ! – सैन्यदलप्रमुख नरवणे

चीनसमवेतच्या करारानंतर चिनी सैनिक पँगाँग सरोवराच्या भागातून मागे हटल्याने भारताला असलेला धोका अल्प झाला असला, तरी पूर्णतः संपलेला नाही, असे सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केले.

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश यांच्या चीन सीमेवरील भारताची सुरक्षा !

सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना लागून चीनची सीमा आहे. या ठिकाणी चीन भारताला त्रास देऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. सिक्कीम, भूतान आणि चीन यांचे जेथे ‘ट्राय जंक्शन’ होते, तेथेही त्यांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे भारत या सीमेवर अधिक लक्ष देत आहे.

(म्हणे) ‘भारत आणि चीन मित्र असल्याने एकमेकांसाठी धोकादायक नाहीत !’ – चीनचे परराष्टमंत्री वांग यी

वांग यी यांनी म्हटलेले हे वाक्य अर्धसत्य आहे ! भारत चीनसाठी धोकादायक नाही; मात्र चीन भारतासाठी धोकादायक आहे. चीन कधीही भारताचा मित्र होऊ शकत नाही.

चीनचे सैन्य पूर्णपणे माघारी गेल्याविना तणाव असलेल्या ठिकाणांपासून भारतीय सैन्य माघारी फिरणार नाही ! – भारताने चीनला सुनावले

चीनवर कधीही विश्‍वास ठेवता येणार नाही, हेच यातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. भारताने अशीच सतर्कता बागळली, तरच चीनला जशास तसे उत्तर देता येईल !

चीनने देप्सांगपासून २४ किमी अंतरावरील चौकीजवळ केले नवीन बांधकाम !

उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्‍वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !