अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !
सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.
सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.
मानेसर येथील बागनकी गावात एका भूखंडावर बांधकामासाठी चालू असलेल्या खोदकामाच्या वेळी ३ प्राचीन मूर्ती सापडल्या. यातील भगवान श्रीविष्णूची दीड फूट उंचीची, श्री लक्ष्मीदेवीची एक फूट उंचीची, तर तिसरी मूर्ती शेषशायी भगवान श्री विष्णु आणि श्री लक्ष्मीदेवी यांची आहे.
श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
इयत्ता १२ वीच्या पाठ्यपुस्तकातून इतकी वर्षे शिकवण्यात आलेला ‘आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत’ हा चुकीचा आहे, असे एन्.सी.ई.आर्.टी. यापुढे नमूद करणार आहे. या विषयावर ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.
‘अयोध्यानगरी हिंदूंच्या प्राचीन सप्तपुरींपैकी एक आहे. या नगरीतील ऐश्वर्याची तुलना स्वर्गलो काशी केलेली आहे. ‘अथर्ववेदा’त या नगरीला ‘ईशपुरी’ म्हटले आहे. प्रभु रामचंद्रांचा जन्म त्रेतायुगात झाला. सध्याची अयोध्यानगरी विक्रमादित्याने २००० वर्षांपूर्वी पुन्हा वसवली.
कित्येक सहस्र वर्षे हिंदु संस्कृतीचे जतन करण्यात मोलाचा वाटा उचलणार्या, तसेच विज्ञान, अध्यात्म आणि सामाजिक स्वास्थ्य जोपासणार्या देवालयांच्या वास्तूशास्त्राचा सूक्ष्म अभ्यास करून त्याचे सामाजिक जीवनात अवतरण करणे, हेच आजच्या युगातील शास्त्रज्ञांना आव्हान आहे !
दिराच्या बांधकामासाठी तबल्यासारखा आवाज देणारे दगड निवडत असत. विशिष्ट मंत्रांचा उच्चार वर्तुळाकार ध्वनी आणि प्रतिध्वनी यांच्या रूपाने मंत्रयुक्त वातावरण निर्माण करत असतो. घंटेचा नाद वर्तुळाकार फिरतो. अशा वर्तुळाकार ध्वनीच्या वातावरणात मनात विचार येणे बंद होते.
कन्याकुमारीच्या देवालयात एका बाजूला सप्तस्वरांचे दगडी स्तंभ आहेत, तर दुसर्या बाजूला मृदुंगाचे ध्वनी स्तंभात बसवलेले आहेत. दगडाचा नाद विशिष्ट स्वरातच यावा, यासाठी याचा परीघ केवढा घ्यावा लागेल, दगडाला आतून किती पोकळ करावे लागेल, याचे बिनचूक गणित आणि शास्त्र त्यामागे आहे.
भारतातील प्राचीन मंदिरे ही अंगभूत वैज्ञानिक उन्नतीचे प्रदर्शक आहेत. असे एकही प्राचीन मंदिर नाही की, ज्यात प्राचीन काळातील वैज्ञानिक प्रगती प्रतीत करणारे उदाहरण नाही.