ममता बॅनर्जी यांची हुकूमशाही !

पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलर आहेत’, अशी ओरड करणारे साम्यवादी, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी ममता बॅनर्जी यांच्या या निर्णयावर मात्र सोयीस्कररित्या मौन बाळवून गप्प आहेत ! ममता बॅनर्जी यांचा हा निर्णय एकप्रकारे शिक्षणक्षेत्राचा बट्ट्याबोळ करणारा निर्णय आहे, असेच म्हणावे लागेल !

पक्षांतर बंदी आणि पक्षनिष्ठा !

सध्या सर्वच राजकीय पक्षांत विविध विचारांच्या नेत्यांची सरमिसळ झालेली पहायला मिळते. हे नेते पक्षाच्या तत्त्वाने बांधील नसतात, ते सत्ता आणि पद यांसाठी एकवटलेले असतात. सर्वच पक्षांत चालू असलेली ही पक्षांतरे हे त्याचेच लक्षण आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता ‘जनतेच्या भल्यासाठी काम करणारे नेते सध्या किती आहेत ?’ हा अभ्यासाचा विषय ठरेल !

‘रक्तरंजित’ अमेरिकी राज्यघटना !

भारताला नेहमी मानवाधिकारांचे डोस पाजणारी अमेरिका स्वत:च्या नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी काही करत नाही. ‘सर्वांत सामर्थ्यवान अमेरिकेची राज्यघटनाच रक्तरंजित असून भारताने तिला आरसा दाखवावा’, असेच गोळीबाराच्या या घटनांवरून भारतियांना वाटते !

‘उगवत्या सूर्या’तील भारत !

योग्य संधी साधून पंतप्रधान मोदी यांनीही सुगा यांचे याविषयी कौतुक करून त्यांना अन् त्यांच्या खासदारांना यंदाचा गणेशोत्सव पहाण्यासाठी भारतात आमंत्रित केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे भारतात वहात असून भारताबाहेरही अशा प्रकारे त्याचे पडसाद उमटत आहेत, हे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी !

शत्रूचे प्रवक्ते !

भारताच्या मुळावर जे जे देश उठले आहेत, त्या त्या देशांच्या प्रवक्त्यांची एकप्रकारे भूमिका काँग्रेसी नेटाने पार पाडतांना दिसतात. अशा काँग्रेसने सत्तेत असतांना चीन आणि पाक यांच्या संदर्भात कसे निर्णय घेतले असतील, हे यावरून लक्षात येते. अशा पक्षाचे अस्तित्व देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्याचे राजकीयदृष्ट्या अस्तित्व संपवणे, यातच खरे राष्ट्रहित आहे !

प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !

मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !

ऑस्ट्रेलियातील ‘हवामान’ निवडणूक !

‘आम्हाला मत दिल्यास विनामूल्य गहू, तांदूळ देऊ’, ‘रस्ता बांधून देऊ’, ‘नोकर्‍या देऊ’, अशी आश्वासने ऐकण्याची सवय असलेल्या भारतियांना हे वाचून थोडे अवघडल्यासारखे वाटेल. ‘पर्यावरण वाचवा’, किंवा ‘हवामान पालटामुळे होणारे दुष्परिणाम’ या सूत्रावर निवडणूक, हे आपल्या पचनी पडणे जरा कठीणच !

उथळ आणि राष्ट्रविरोधी !

ज्या देशाने भारतावर दीडशे वर्षे राज्य करून, त्याची दुर्दशा करून त्याला गुलाम बनवले; अत्यंत समृद्ध आणि सोन्याचा धूर निघणार्या या देशातील सर्वच क्षेत्रांतील मूळ व्यवस्था उद्ध्वस्त करून त्याला अधोगतीच्या खाईत ढकलले; ज्यांनी भारताची गुरुकुल पद्धत संपवून…

सूक्ष्मस्तरावर कार्य करणारे एकमेवाद्वितीय !

‘जेव्हा जेव्हा अधर्म बळावतो, तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो आणि धर्माची पुनर्स्थापना करतो’, असे श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवले आहे. भगवान श्रीकृष्णाचे पूर्ण चरित्र पाहिल्यास त्यात विविध गोष्टी अंतर्भूत आहेत.

दिवाळखोरीची बिकट वाट !

गेल्या काही मासांपासून आपण श्रीलंकेची दिवाळखोरीकडे होणारी वाटचाल पहात आहोत. त्यात आता आणखी काही देशांची भर पडत आहे. अर्थात्च यांतील एक देश म्हणजे भारताचा शत्रू असणारा पाकिस्तान ! हा देशही आता दिवाळखोर होण्याच्या मार्गावर आहे.