केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ७ जानेवारीला कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपचा ७ जानेवारीला कणकवलीत ट्रॅक्टर मोर्चा

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ ७ जानेवारीला कणकवली शहरातील भाजप कार्यालय ते प्रांत कार्यालयापर्यंत भाजपच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

गोव्यातील ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला सांगे येथे प्रारंभ : भरपाईसाठी लेखी आश्‍वासन देण्याची मागणी

गोव्यातील ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला सांगे येथे प्रारंभ : भरपाईसाठी लेखी आश्‍वासन देण्याची मागणी

या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.

ऊस उत्पादकांना पुढील आठवड्यात हानीभरपाई देणार ! – खासदार नरेंद्र सावईकर

ऊस उत्पादकांना पुढील आठवड्यात हानीभरपाई देणार ! – खासदार नरेंद्र सावईकर

निर्धारित मुदतीत शासनाने ऊस उत्पादकांना कोणतेही सहकार्य न केल्याने ऊस उत्पादक संघटनेच्या झेंड्याखाली सर्व ऊस उत्पादक सांगे येथे २ जानेवारीपासून धरणे आंदोलन करणार आहेत.

युवा शेतकरी श्याम गावकर यांच्या कष्टाने साट्रे (तालुका सत्तरी) येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन यशस्वी

युवा शेतकरी श्याम गावकर यांच्या कष्टाने साट्रे (तालुका सत्तरी) येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन यशस्वी

सत्तरी हा उत्तर गोव्यातील शेवटचा ग्रामीण तालुका ! काजू, सुपारी, नारळ, केळी, आंबा अशी शेती उत्पादने येथे मोठ्या प्रमाणात घेतली जातात. या उत्पादनांमध्ये आता स्ट्रॉबेरीचीही भर पडली आहे. सत्तरीतील युवा प्रगतशील शेतकरी श्याम गावकर यांनी म्हादई अभयारण्यातील साट्रे गावात स्ट्रॉबेरीचे पीक घेतले आहे.

शरद पवार यांच्याविषयी ‘जाणता’ नव्हे, तर ‘विश्वासघात राजा’ म्हणून लिहिले जाईल ! – माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टीका

शरद पवार यांच्याविषयी ‘जाणता’ नव्हे, तर ‘विश्वासघात राजा’ म्हणून लिहिले जाईल ! – माजी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची सडकून टीका

नव्या कृषी कायद्याला पाठिंबा देण्याकरिता रयत क्रांती संघटना आणि भाजप यांच्याकडून ‘किसान आत्मनिर्भर यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. त्या वेळी ते बोलत होते.

संधीसाधू काँग्रेस !

संधीसाधू काँग्रेस !

एवीतेवी लोकशाहीचा टेंभा मिरवणारी काँग्रेस स्वतःचा स्वार्थ साधतांना नेहमीच लोकशाहीचा गळा घोटते, हाही इतिहास आहे. कृषी कायद्याचेच पहायचे झाले, तर हा कायदा लोकशाही मार्गाने सार्वभौम संसदेने संमत केला. तरीही काँग्रेस यास विरोध करून एक प्रकारे लोकशाहीचा अवमानच करत नाही का ?

मंदिरात रहाणार्‍या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ? – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

मंदिरात रहाणार्‍या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ? – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

मंदिरात रहाणार्‍या एका फकिराला दिलेले वचन सरकारला पाळता येत नसेल, तर सामान्य जनतेचे काय ?, अशी उद्विग्नता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

(म्हणे) ‘मोदी त्यांच्या पत्नीसमवेत ५ दिवसही राहिले नसल्याने ते देशावर शासन करण्यास असमर्थ !’ – तमिळनाडूतील ख्रिस्ती बिशप एजरा सरगुनम यांची अश्‍लाघ्य टीका

असे पाद्री चर्चमध्ये असतील, तर ते समाजाला कशा प्रकारचे मार्गदर्शन करत असतील, हे लक्षात येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड उघडतील का ?

हरभरा उत्पादनवृद्धीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी आत्मसात करावे ! – मुकुंद म्हेत्रे

हरभरा उत्पादनवृद्धीचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी आत्मसात करावे ! – मुकुंद म्हेत्रे

शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात हरभरासारख्या पिकासाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. यामुळे हरभर्‍याचे उत्पन्न ३० ते ४० प्रतिशत वाढून शेतकर्‍यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वृद्धी होईल, असा विश्‍वास कृषी पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी व्यक्त केला.

कृषीविषयी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जात मिळण्यासाठी ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

कृषीविषयी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जात मिळण्यासाठी ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.