ईशनिंदाविरोधी कायदा करा !

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटना प्रत्येक नागरिकाच्या धर्मश्रद्धांचा आदर करण्याचे सूचित करते; मात्र आज नाटके, चित्रपट, वेबसिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे.

चित्रपट, नाटके, ओटीटी प्लॅटफॉर्म, तसेच विविध माध्यमे यांद्वारे हिंदूंच्या देवता, तसेच हिंदुत्वावर होणार्‍या आघातांना आळा घाला ! – हमारा देश संघटना

सातत्याने हिंदुत्व, हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांची विटंबना केली जाते. या प्रकाराला तात्काळ आळा घालावा, यासाठी हमारा देश संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोल्हापुरात होणार अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन सोहळा

धर्मगुरूंचे सानिध्य, तसेच बांगलादेश आणि नेपाळ येथील महासंघाच्या पदाधिकार्‍यांची विशेष उपस्थिती. अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या नववा वर्धापनदिन कोल्हापूर येथे ६ फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येणार आहे

 मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे ! – रामराजे नाईक-निंबाळकर

मराठ्यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा, तसेच नवीन माध्यमांचा अधिकाधिक विनियोग करून कसोशीने प्रयत्न करायला हवेत, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

प्रजासत्ताकदिनी संगमनेर येथील ज्येष्ठ नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमानंतर २६ जानेवारी या दिवशी भूमीच्या वादातून अनिल शिवाजी कदम या ज्येष्ठ नागरिकाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पोलिसांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

लाचप्रकरणी शिर्डी येथील २ पोलीस अटकेत

१७ ते २५ जानेवारी या कालावधीत शिर्डीतील हॉटेलवर चालू असलेली कारवाई टाळण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्यातील बाळासाहेब यशवंत सातपुते आणि प्रसाद पांडुरंग साळवे या २ पोलीस कर्मचार्‍यांना लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

सोलापूर जिल्ह्यातील बंधार्‍यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी रुपयांचा निधी

जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर मासांत झालेल्या अतीवृष्टीमुळे सिंमेंटच्या बंधार्‍यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. अनेक ठिकाणी पाण्याच्या प्रवाहामुळे बंधार्‍यांचे बांध वाहून गेल्याच्या घटना घडल्या होत्या.

कोरोना लस आणल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस निर्माती आस्थापने यांचे सभागृहाकडून अभिनंदन !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठरावावर चर्चा करतांना कोरोना महामारी चांगल्या रितीने हाताळल्याने संपूर्ण जग भारताकडे कौतुकाने पहात असल्याचे सांगितले.

नागपूर येथे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याच्या प्रकरणी साहाय्यक आयुक्तांना अटक

९ लाख रुपयांचे देयक संमत करण्यासाठी राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयातील साहाय्यक आयुक्तांनी ३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केल्याच्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक त्यांना केली आहे.

काठ्या आणि झेंडे घेऊन या ! – व्हिडिओद्वारे शेतकर्‍यांना चिथावणी

देहलीतील हिंसाचाराच्या प्रकरणी आतापर्यंत टिकैत यांच्यासहित सर्व शेतकरी नेत्यांना कारारगृहात टाकणे अपेक्षित होते ! तसे न होणे, ही देहली पोलिसांची निष्क्रीयताच म्हणावी लागेल !